vijay wadettiwar on municipal elections during corona sure in maharashtra  sakal
महाराष्ट्र बातम्या

..तर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणार - विजय वड्ट्टेवार

सकाळ डिजिटल टीम

राज्यात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहीले आहे. मुंबई, पुणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये कोरोना रूगांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज ११३४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामुळे महापालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर संकट निर्माण झाले आहे. दरम्यान कोरोना वाढल्यास राज्यातील महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूर आयोगाकडे करू असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्ट्टेवार यांनी म्हटले आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकींवर सावट आले आहे. यावर बोलताना विजय वड्ट्टेवार यांनी पुढचे आठ दहा दिवस महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. या दहा दिवसात किती पट रूग्ण संख्या किती वाढतेय त्यावरच निर्णय घेता येईल. येणाऱ्या निवडणूकीला बराच कालावधी आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम स्पष्ट होतोय. दोन महिने आहेत, त्या परिस्थितीवर चर्चा होईल. तशी परिस्थिती उद्भवली तर आम्हाला विनंती करावी लागेल. निवडणुका टाळता येतील का? हा देखील प्रश्न असल्याचे वड्ट्टेवार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT