file photo 
महाराष्ट्र बातम्या

मराठवाड्यात दुपारी 1 वाजेपर्यंत किती झाले मतदान? (Video)

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद - मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच विविध भागात पावसाने हजेरी लावलेली असतानाही मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.51 टक्‍के तर त्यापाठोपाठ जालना 34.82, परभणी 32.7, बीड 29.69, औरंगाबाद 28.90, उस्मानाबाद 26.24, नांदेड 25.97, लातूरमध्ये 28.17 टक्‍के मतदान झाले. 

मतदानाच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी रात्री उशीरापर्यंत मतदारांच्या भेटीवर उमेदवार व त्यांच्या नातेवाईक, पदाधिकाऱ्यांनी भर दिला होता. पाऊस आला तरी मतदान करून घ्या, अशा सूचना सर्वत्र करणे सुरु होते. विशेष म्हणजे प्रथमच पुणे, नाशिक औरंगाबाद येथील मतदारांना आपापल्या मतदार संघात घेऊन जाण्यासाठी वातानुकुलीत वाहनांची सोय करण्यात आली होती. दुपारनंतर मतदानाची टक्‍केवारी वाढेल, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे. 

रस्त्यावरील मतदारसंघातील मतदारांसाठी हॉटेलमध्ये जेवनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रथमच बाहेर गावात असलेल्या मतदारांना आणण्यात येत असल्याचे चित्र जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळाले. गावागावामध्ये मतदानाची टक्‍केवारी वाढावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

वडील समजून दुसऱ्यावरच अंत्यसंस्कार; हत्या करून जाळून फेकलेल्या मृतदेहाचे रहस्य कायम

Jintur accident news: जिंतूरजवळ भीषण अपघातात वसमतचे मामा-भाचा ठार; शहरात शोककळा, बाजार बंद

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

SCROLL FOR NEXT