mahavitaran 
महाराष्ट्र बातम्या

प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना लवकरच वीजजोड - प्राजक्त तनपुरे

सकाळवृत्तसेवा

राहुरी - भाजप सरकारच्या काळातील निष्क्रियतेमुळे ऊर्जा खात्याचा कारभार व यंत्रणा ठप्प आहे. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी बंद आहे. ज्या रोहित्रांवर भार कमी आहे, तेथे दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना नवीन वीजजोड देण्याचा सरकारचा विचार आहे, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी सांगितले.

राहुरी येथे तहसील कार्यालयात आज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरात मंत्री तनपुरे बोलत होते. 

तनपुरे म्हणाले, ‘‘जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी ऊर्जा खात्याशी संबंधित आहेत. जनता दरबारात आलेल्या सर्व अर्जांचा निपटारा करण्याचा प्रयत्न राहील. सरकारच्या विविध खात्यांतील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात. नागरिकांना लोकप्रतिनिधींकडे हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये.’’

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्जमाफी देताना सोपी, सुलभ व सुटसुटीत प्रक्रिया राबविली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या अधिवेशनात सुखद बातमी अपेक्षित आहे,  शेतकऱ्यांची दोन लाखांपुढील रकमेची कर्जमाफी सरकारच्या विचाराधीन आहे, असेही तनपुरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT