ship sakal
महाराष्ट्र बातम्या

समुद्रातील खारट पाणी व कोणतेही सांडपाणी शुद्ध करून पिता येणार; डॉ. सोनगे यांना जलशुद्धीकरणाचे पेटंट

समुद्र, बोअरवेलचे अशुद्ध पाणी आणि विविध आस्थापनेतील सांडपाणी आता सहजपणे शुद्ध करणे शक्य होणार आहे. तसेच आर.ओ. प्लांटमधून बाहेर पडणारे ७० अशुद्ध पाणी देखील शुध्द करून पिण्यायोग्य करता येणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : समुद्र, बोअरवेलचे अशुद्ध पाणी आणि विविध आस्थापनेतील सांडपाणी आता सहजपणे शुद्ध करणे शक्य होणार आहे. तसेच आर.ओ. प्लांटमधून बाहेर पडणारे ७० अशुद्ध पाणी देखील शुध्द करून पिण्यायोग्य करता येणार आहे. त्यासाठी एन.के. ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीचे प्र. प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे यांनी ‘प्युरीफिकेशन ऑफ इंपोटेबल ॲण्ड वेस्ट वॉटर’ हे संशोधन केले आहे. त्याला भारतीय बौद्धिक संपदा विभागाकडून ‘जलशुध्दीकरणा’चा पेटंट देखील मिळाला आहे.

मराठवाडा, विदर्भात सौरऊर्जा मुबलक आहे, पण पाण्याचे दुर्भिक्ष मोठे आहे. तेथील सांडपाणी शुद्ध करून पिण्यायोग्य करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होवू शकतो. दुसरीकडे देशातील अनेक भागातील लोक आर्सेनिक व फ्लोराईड असे जड धातू जास्त असलेले धोकादायक अशुद्ध पाणी पितात. त्यातून हात-पाय वाकडे होणे, पोटाचे आजार, कर्करोग होण्याच्या समस्या देखील आढळतात. समुद्रकिनाऱ्यावरील लोकांना व जहाजावरून प्रवास करणाऱ्यांना समुद्रातील क्षारयुक्त पाणी उपलब्ध असूनही ते पिता येत नाही. त्याठिकाणी देखील हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.

भूगर्भातून पाणी उपसा करून ‘आरओ’ सयंत्रामधून शुध्द केले जाते. पण, त्यातील ७० टक्के पाणी सांडपाणी म्हणून फेकून द्यावे लागते. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. मात्र, या संशोधनामुळे पर्यावरणाची हानी थांबवता येणार आहे. कोणत्याही स्त्रोतातील अशुद्ध पाणी सौरऊर्जा, उष्णता व ऊर्जेचा किंवा इतर वाया जाणाऱ्या औष्णिक ऊर्जेचा वापर करून पाणी शुध्द करता येते, हे डॉ. सोनगे यांनी प्रयोगाअंती सिद्ध केले आहे.

जलशुद्धीकरणाचे असे आहे नवतंत्रज्ञान

  • - जहाज असो वा अन्य कोणत्याही उद्योगातील इंजिनमधून ३० टक्के ऊर्जा धुरावाटे बाहेर फेकली जाते. वाया जाणाऱ्या त्या ऊर्जेचा पुनर्वापर करून त्यावर अशुद्ध पाणी शुद्ध करता येणार आहे.

  • - कोणत्याही ऊर्जेचा वापर करून सर्वप्रथम हवा व पाण्याचे मिश्रण केले जाते. त्यामुळे हवेची आर्द्रता वाढते. त्याला पुन्हा थंड केल्यानंतर त्यातून शुद्ध पाणी मिळते.

  • - सौरउर्जेचा वापर करून देखील अशुद्ध किंवा सांडपाणी शुद्ध करणे शक्य आहे. पाण्यातील फ्लोराईड, आर्सेनिक असे जड धातू या तंत्रज्ञानातून काढून टाकता येतात. त्यामुळे कोणत्याही आजाराची शक्यता उद्‌भवत नाही.

  • - या संशोधनामुळे समुद्र किनारी राहणाऱ्यांना क्षारयुक्त पाणी शुद्ध करता येईल. पाणी टंचाई किंवा अशुद्ध पाणी असलेल्या भागातील लोकांना तेथील सांडपाणी शुद्ध करून पिण्यायोग्य पाणी देणे सहज शक्य होईल.

अशुद्ध, सांडपाणी शुद्ध करून पिण्यायोग्य बनविणारे तंत्रज्ञान

महाविद्यालयातील प्रयोगशाळेच्या माध्यमातून दीड ते दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर ‘प्युरीफिकेशन ऑफ इंपोटेबल ॲण्ड वेस्ट वॉटर’चे संशोधन पूर्ण केले आहे. या तंत्रज्ञनाच्या माध्यमातून अशुद्ध पाणी शुद्ध करून प्रत्येकाला पिण्यायोग्य पाणी मिळेल. जलशुद्धीकरणाचे पेटंट मिळाल्यानंतर आता पथदर्शी प्रकल्प तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

- डॉ. बी. के. सोनगे, प्र-प्राचार्य, ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT