solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

मे महिन्यात सोलापूरला ५ दिवसाआड पाणी? उजनी उणे १७ टक्क्यांवर; १० मार्चनंतर भीमा नदीतून सोलापूरसाठी पाणी; आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख म्हणाले...

महापालिकेवर काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती, भाजपही पाच वर्षे सत्तेत राहिला. पण, सोलापूरकरांना नियमित पाणी मिळाले नाही. सध्या चार दिवसाआड पाणी असून साधारणत: १० मेपासून त्यात एक दिवसाची वाढ होण्याची शक्यता महापालिका अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेवर काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती, भाजपही पाच वर्षे सत्तेत राहिला. पण, सोलापूरकरांना नियमित पाणी मिळाले नाही. सध्या चार दिवसाआड पाणी असून साधारणत: १० मेपासून त्यात एक दिवसाची वाढ होण्याची शक्यता महापालिका अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक असल्याने या काळात पाणीपुरवठा विस्कळित होणार नाही, याची खबरदारी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.

सोलापूर शहराजवळील हद्दवाढ भाग १९९२ रोजी महापालिकेत समाविष्ट झाला, पण अजूनही तेथील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. आता समांतर जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटीतून सुरू आहे, पण काम पूर्ण झाल्यानंतरही शहरांतर्गत जलवाहिनी व्यवस्था सुधारावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून लोकसभेवेळी शहरातील पाणी, बेरोजगारी, तरुणांचे स्थलांतर असे मुद्दे प्रचारात आणले जातील. त्यामुळे सत्ताधारी आमदारांकडून शहराच्या पाणीपुरवठ्यावर दररोज लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा आहे.

पण, ‘सोलापूरला नियमित पाणी आम्हीच देवू’ अशी खात्री भाजपचे आमदार देत आहेत. ‘सत्ताधाऱ्यांनी विमानसेवा दोन महिन्यात सुरू होणार होती, त्याचे काय झाले’ असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. आता निवडणुकीत सोलापूरचा पाणीप्रश्न पेटणार हे निश्चित मानले जात आहे.

आम्हीच सोलापूर शहराला देऊ नियमित पाणी

काँग्रेसची महापालिकेवर जवळपास ४० वर्षे सत्ता राहिली, पण त्यांनी शहराच्या भविष्याचा कधी विचार केला नाही. आता मोदी सरकार व राज्यातील महायुतीचे सरकार विकासाला प्राधान्य देत असून समांतर जलवाहिनी पूर्ण होत असतानाच ‘अमृत-२’मधूनही निधी मिळेल. त्यानंतर शहराला दररोज पाणी मिळेल, अशी खात्री असून विमानसेवा देखील काही महिन्यात सुरू होईल.

- विजयकुमार देशमुख, आमदार, भाजप, शहर उत्तर

---------------------------------------------------------------------------------------

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचेच, तरीपण विकास नाही

जिल्ह्याचेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी सोलापूरला मोठी आशा होती. पण, ना उद्योग ना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. आता मोदी सरकारने गॅरंटी देत प्रत्येक घरी पाण्याचा नळ देण्याची योजना आणली. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर अमृत-२ योजनेतून पाइपलाइन, ड्रेनेजची कामे होतील. त्यानंतर ३०-४० वर्षांपासूनचा सोलापूर शहराचा प्रश्न सुटेल.

- सुभाष देशमुख, आमदार, भाजप, दक्षिण सोलापूर

१० मार्चला सोलापूरसाठी पाणी अन् मार्चअखेर दुबार पंपिंग

उजनीतील पाणीसाठा सध्या उणे १७ टक्के असून सोलापूर शहराला १० मार्चपासून भीमा नदीतून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्यानंतर उजनीतील साठा उणे ३२ टक्के होईल. मार्चअखेर महापालिकेला दुबार पंपिंग करावे लागणार असून पाणी कमी झाल्याने मेमध्ये सोलापूरचा पाणीपुरवठा पाच दिवसाआड होवू शकतो. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT