पंढरपूर - उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी sakal
महाराष्ट्र बातम्या

आषाढी वारी काळातील पूरस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणातून सोडले पाणी! धरणातून सोडलेला २५,००० क्युसेकचा विसर्ग आज पंढरपुरात; चंद्रभागा नदीचे पात्र भरणार काठोकाठ

उजनी धरणातून शनिवारी (ता. २१) सोडलेला २० हजार क्युसेकचा वाढीव विसर्ग व नीरा नदीतून येणारा पाच हजारांचा विसर्ग उद्या (सोमवारी) सकाळी दहा-साडेदहा वाजेपर्यंत पंढरपुरात येईल. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील विसर्ग तेव्हा २५ हजार क्युसेक होऊन नदीपात्र काठोकाठ भरलेले असेल.

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरणातून शनिवारी (ता. २१) सोडलेला २० हजार क्युसेकचा वाढीव विसर्ग व नीरा नदीतून येणारा पाच हजारांचा विसर्ग उद्या (सोमवारी) सकाळी दहा-साडेदहा वाजेपर्यंत पंढरपुरात येईल. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील विसर्ग तेव्हा २५ हजार क्युसेक होऊन नदीपात्र काठोकाठ भरलेले असेल, अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापनच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचेही आवाहन केले आहे.

सोलापूर व पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरण पहिल्यांदाच २२ जूनपर्यंत ७७ टक्के भरले असून सध्या उजनीतून २६ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग भीमा नदीतून सोडून देण्यात आला आहे. दौंडवरून धरणात १५ हजार क्युसेकची आवक आहे. पाणी आताच अडवून ठेवले तर धरण आठ दिवसांत १०० टक्के भरेल आणि आषाढी वारीच्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास धरणातून मोठा विसर्ग नदीतून सोडावा लागू शकतो. त्यामुळे नदीकाठी पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच त्याची खबरदारी घेत धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवसांत धरणातून २५ ते ३० हजार क्युसेकने पाणी नदीत सोडून पुढे वारीपूर्वी तो विसर्ग दहा हजारांपर्यंत ठेवला जाणार आहे. २८ जूनपासून मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने धरणातून एकाचवेळी नदीतून मोठा विसर्ग सोडावा लागणार नाही, याचीही दक्षता घेतली जात आहे. उजनीत सध्या १०५ टीएमसी पाणी असून त्यात ४१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

आषाढीपूर्वी सोडले जाणार ८ टक्के पाणी

६ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा रंगणार आहे. त्यावेळी पंढरपुरात राज्यभरातील १३ ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा पोलिस प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात (वाळवंट) वारी काळात पाण्याचा विसर्ग जास्त राहणार नाही, याची दक्षता लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून घेतली जात आहे. त्यासाठी सध्या धरणातून २६ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग भीमा नदीतून सोडून देण्यात आला आहे. वारीपूर्वी ७८ टक्के भरलेल्या धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यांवर आणला जाणार आहे. वारीच्या काळात चंद्रभागेच्या वाळवंटातही भाविक थांबू शकतील, त्यांना धोका होऊ नये हा त्यामागील हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

Video Viral: रनआऊट होताच रागात बॅट फेकली अन् आपल्याच टीममेटवरही भडकला, पाकिस्तानी खेळाडूचा उद्दामपणा

बापरे! जयंतचे डोळे जाणार? जान्हवीच्या मदतीला 'तो' येणार... लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...'असला फालतूपणा'

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT