महाराष्ट्र

युतीबाबत आमचं ठरलं; इतरांनी तोंड घालू नये : उद्धव ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युतीबाबत ठरले आहे. इतर कोणीही यामध्ये तोंड घालू नये, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आता शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, असेही ते म्हणाले.

गिरीश महाजन यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा ज्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडवणे हे अधिक महत्वाचे आहे. 

सर्वसामान्यांसाठी शिवसेना सत्तेत

शेतकऱ्यांनी आपली सर्व दुःख बाजूला ठेऊन आपल्याला लोकसभेत निवडून दिले. त्यामुळे आता त्यांची दुःख दूर करणे हे आपले कर्तव्य असून, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी शिवसेना सत्तेत आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT