Aurangabad Crop Damage sakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Updates : अवकाळीने 'होरपळलेला' शेतकरी पुन्हा संकटात; दोन दिवस पावसाची शक्यता

होळीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरतोच आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात होळीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीतून शेतकरी अजूनही सावरतोच आहे. पण आता पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजपासून पुढचे दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

१३ मार्च ते १५ मार्च या कालावधीमध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. १४ आणि १५ मार्चला पावसाची शक्यता अधिक आहे. तर नागपूरमध्ये १६ मार्च रोजी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अशा वातावरणामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तापमानात मोठी घट होऊ शकते. मात्र अवकाळी पाऊस सरल्यानंतर उकाडा मात्र अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्याची पावसाची तीव्रता पाहून हरभरा, गहू, मोहरी, जवस अशा पिकांचा कापणी, मळणी केलेला शेतमाल अधिक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT