Haribhau Rathod_Prakash Shendage 
महाराष्ट्र बातम्या

मध्य प्रदेशात OBC आरक्षण मार्गी; राज्यातील ओबीसी नेत्यांना काय वाटतं?

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मध्य प्रदेशला सुप्रीम कोर्टानं दिलासा देत ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. पण महाराष्ट्रात मात्र अद्याप आरक्षणाचा पेच कायम आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांचं म्हणणं काय आहे? हरिभाऊ राठोड आणि प्रकाश शेंडगे यांनी काय म्हटलंय पाहुयात. (What thinks OBC leaders of Maharashtra on MP OBC reservation is settled)

हरिभाऊ राठोड म्हणतात, मध्य प्रदेशला जसा दिलासा मिळाला तसा दिलासा महाराष्ट्राला देखील नक्कीच मिळू शकेल. इम्पिरिकल डेटासाठी आयोग काम करतोय त्याबाबत २५ तारखेला आम्ही डेमो देणार होतो. वीस ते पंचवीस दिवसात आपण महाराष्ट्रातील ओबीसींचा योग्य डेटा गोळा करु शकतो. त्यामुळं आपलं देखील आरक्षण आबाधित राहिल हे मी कालपासून सांगतोय. ज्या चुका महाराष्ट्र सरकारनं केल्या या आता तरी करु नयेत.

मध्य प्रदेशनं सहा महिन्यापूर्वीच इम्पिरिकल डेटासाठी डेडिकेटेड आयोग नेमला. आपण महिन्या-दीड महिन्यापूर्वी हा आयोग नेमला. खरंतर ही केस आपली होती. इम्पिरिकल डेटासाठी आयोग नेमायला आपण १३ महिने लावले. सुप्रीम कोर्टानं सांगितलेल्या ट्रिपल टेस्टमधली ही पहिली अट होती. तिथंच आपण चुकलो आहोत.

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणतात, ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी मध्य प्रदेश सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं काय केलं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. सुप्रीम कोर्टानं इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे आदेश महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारलाही दिले. पण मध्य प्रदेश सरकारनं ही केस गांभीर्यानं लढले त्यांनी तुषार मेहतांसारखे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया असा निष्णात वकील दिला. पण महाराष्ट्र सरकारनं दुय्यम वकील दिले. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारनं कपिल सिब्बल, मनु सिंघवी, रफिकदादा, मुकूल रोहतगी असे बडे वकील नेमले. पण ओबीसी आरक्षणासाठी सुरुवातीपासून दुय्यम वकील दिले.

महाराष्ट्रानं ओबीसी आरक्षणाची केस गांभीर्यानं लढलीच नाही. सुरुवातीला तर वेळ घेण्यातच त्यांनी वेळ घालवला. ४ मार्च २०२१ रोजी इम्पिरिकल डेटा गोळा करायचा आदेश सरकारला सुप्रीम कोर्टाकडून मिळाला. त्यानंतर वर्षभर सरकारनं नुसता गोंधळ घातला. यामध्ये मागासवर्ग आयोग त्यावर राजकीय नेमणुकांचा, फंड नाही अशा अनेक अडचणी आल्या. गेल्यावर्षी सांगितलं तरी या ४ मार्च रोजी सरकारनं ओबीसी आऱक्षणासाठी डेडिकेट आयोग नेमला. पण त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडेच ते काम दिलं, त्यात सरकारनं आपल्याच माणसांची नेमणूक केली. यामुळं ओबीसींचं मातेरं झालं, असंही यावेळी प्रकाश शेंडगे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT