raj thakceray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : सत्ता आल्यावर ती जाण्याची प्रक्रिया सुरू होते; राज ठाकरेंचा भाजपसह माध्यमांना टोला

सकाळ डिजिटल टीम

Pimpri Chinchwad News - पिंपरी चिंचवड येथे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपसह माध्यमांवर जोरदार टीका केली. तसेच सत्ताधारी पराभूत होत असतात, पण विरोधक विजय होत नसतात अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपला नाव न घेता टोला लगावला.

राज ठाकरे यांनी पत्रकारांवर बोलताना म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्रात पत्रकार परिषदा घेऊच नये, असं वाटतं. कारण त्यांच्याकडे प्रश्नच नसतात. सध्या याला काय वाटतं? त्याला काय वाटत? तेच चालू आहे. वृत्तवाहिन्यांवर तेच सुरू आहे. उत्तम काम करणारे अनेक पत्रकार आहेत. मात्र राजकारणाची भाषा घसरली आहे. राजकारणातील अनेक नेते वाहियातपणे बोलत आहेत. कारण तुम्ही त्यांना दाखवतात.

राज ठाकरे पुढं म्हणाले, तुम्ही मध्यमांनी दक्षता घ्यावी. मागचा पुढचा अभ्यास नसतो, इतिहास माहित नसतो. त्यामुळे मी काहींना उत्तर देतच नाही. प्रत्येकाचा एक काळ असतो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती जायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असतं. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्ष हारत असतो, असंही राज यांनी नमूद केलं.

दरम्यान अटल बिहार वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी व्हायची. पण मतं मिळत नव्हते. मात्र हळूहळू काळ बदलतो, त्यावेळी गर्दी मतांमध्ये येते. कोणतेही चढउतार न पाहता, पत्रकार म्हणून काहीही विचारतात. तुम्ही असचं काहीही विचारणार असले तर मी राज ठाकरे आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT