महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षा कधी होणार? वर्षा गायकवाड यांनी दिले उत्तर

तेजस वाघमारे


मुंबई, : सीबीएसई मंडळाने दहावी बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानंतर राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा 1 मे रोजी आणि बारावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. तर मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षा कधी होणार याकडे लक्ष लागले होते. शिक्षक संघटनांकडूनही परीक्षांबाबत निर्णय घेण्याची मागणी होत होती. अखेर शिक्षण मंत्र्यांनी या प्रश्नांवर पडदा टाकला आहे. दहावीची परीक्षा 1 मे रोजी आणि बारावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली.

त्याचप्रमाणे पाचवी ते आठवी पर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी थोडे दिवसांची वाट बघून याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती घेऊनच शाळा सुरू करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. मुंबई-पुणे व्यतिरिक्त अनेक भागांमध्ये शाळा सुरू झाल्या असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

When will the 10th-12th exams be held Varsha Gaikwads reaction

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT