sanjay raut sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

"छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल लिहिताना भान राखावं"

साहित्य संमेलनातील कालच्या घटनेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया.

सुधीर काकडे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काल ज्येष्ठ लेखक गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर काल शाई फेकण्याची घटना घडली. त्यावर बोलताना आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महामानवांच्या बाबातीत लिखाण करताना भान राखलं पाहिजे, कोट्यवधी लोकांच्या भावना त्यांच्याशी जोडलेल्या असतात अशा भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या चुकीच्या पंडित नेहरुंना आणि मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती असं त्यांनी सांगितलं. तरी आम्ही साहित्य संमेलनात झालेल्या कृत्याचा निषेध करतो असं त्यांनी सांगितलं.

संसदेचं हिवाळी अधिवेश सुरू असून, विरोधी पक्षांच्या १२ खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. याबद्दल बोलताना त्यांनी संसदेत रणनिती ठरवण्यासाठी थोड्याच वेळात खासदार मल्लीकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, लेखक गिरीश कुबेर यांनी Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra हे पुस्तक लहिलं आहे. यामध्ये संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह माहिती प्रसिद्ध केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. याचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने कुबेर यांच्यावर शाईफेक केली. मात्र यानंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनीधींना यासंदर्भात महिती विचारल्यानंतर पुस्तकात काय आहे, हे दूरच, पण पुस्तकाचं नावंही सांगता आलं नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने कोणत्या आधारे हे कृत्य केलं, या स्पष्टीकरण पाहाणं महत्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT