Chhatrapati Shivaji Maharaj Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांना एवढ्या उपाध्या कुणी आणि कशा दिल्या?

शिवाजी महाराजांना शेरशिवराज, श्रीमंतयोगी यासोबत असे अनेक बिरूदं आहेत. ते कुणी दिले? त्यावरून सध्या वाद सुरू झाले आहेत.

दत्ता लवांडे

विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेच्या अधिवेशनात संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. 'छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते' या वक्तव्यावरून शिंदे गट आणि भाजपचे नेत्यांकडून त्यांचा निषेध व्यक्त केला जातोय. तर राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाडांनीही औरंगजेब क्रूर नव्हता असं वक्तव्य केलं. खासदार अमोल कोल्हेंनीसुद्धा संभाजीराजे धर्मवीर असल्याचे पुरावे इतिहासात नसल्याचं सांगतिलंय. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाच्या नावापुढे 'जी' लावल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

या सगळ्या वादानंतर संभाजी महाराजांना धर्मवीर बिरूद लावायचं की स्वराज्यरक्षक? हा प्रश्न आता उपस्थित झालाय. तर शिवाजी महाराजांनासुद्धा एकापेक्षा अनेक उपाध्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणल्याने त्यांना मर्यादित कर्तृत्वात बंदिस्त करण्यासारखं होईल असं अजित पवार म्हणाले होते त्यामुळे महाराजांच्या उपाध्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पण शिवाजी महाराजांना या उपाध्या कशा प्राप्त झाल्या किंवा कुणी आणि कशा दिल्या हे आपल्याला माहितीये का?

शिवाजी महाराजांच्या नावापुढे कुणी काय काय बिरूदं लावली?

स्वराज्य संस्थापक

त्यांनी मुघलांशी लढा देऊन पहिल्या स्वराज्याची स्थापना केली म्हणून त्यांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हटलं जातं.

छत्रपती

इ.स. १६७४ मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांना छत्रपती हे बिरूद लागलं.

शेरशिवराज

शिवरायांच्या काळातील तत्कालीन कवी, कवी भूषण यांनी त्यांना शेरशिवराज हे बिरूद लावलं होतं.

गोब्राह्मणप्रतिपालक

काही इतिहासकारांनी आपल्या कादंबरी, पुस्तकांत शिवाजी महाराजांच्या नावापुढे गोब्राह्मणप्रतिपालक असं बिरूद लावलं. काहीजणांकडून हे बिरूद इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी लावल्याचा दावा केला जातो.

जाणता राजा

रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांच्या नावापुढे जाणता राजा हे बिरूद लावलं.

रयतेचा राजा

काही इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख रयतेचा राजा म्हणून केला.

कुळवाडीभूषण

महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांचा कुळवाडीभूषण म्हणजे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे भूषण असा उल्लेख केला.

हिंदूनृसिंह

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शिवरायांना हिंदूनृसिंह अशी उपाधी दिली.

श्रीमंतयोगी

रणजित देसाई यांच्या पुस्तकानंतर शिवरायांना श्रीमंतयोगी असं बिरूद लागलं.

छत्रपती शिवाजी महाराजांना असलेल्या बिरूदावरून अनेकवेळा वाद उफाळताना दिसतात. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा महात्मा फुलेंनी दिलेल्या कुळवाडीभूषण या बिरूदाचा वापर करतात तर गोब्राह्मणप्रतिपालक आणि जाणता राजा या बिरूदाचा विरोध करताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT