Manoj Jarange Patil Shantata Rally Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: माझ्या मागे कोण आहे? मला पैसे कोण पुरवतो? सतत होणाऱ्या आरोपांवर जरांगे पाटील थेटच बोलले

Shantata Rally Of Jarange Patil: शांतता रॅलीच्या पहिल्या टप्प्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये ते शांतता रॅली काढत आहे. त्यांच्या या शांतता रॅलीला 7 ऑगस्टपासून सोलापुरातून सुरूवात झाली होती.

आशुतोष मसगौंडे

राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.

दरम्यानच्या काळात अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर हे आंदोलन चिघळले होते. तसेत मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट अंगावर घेतले होते.

आशात जरांगे यांनी भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव घेत टीका सुरू केली आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक आरोपही केले आहेत.

आशात मनोज जरांगे सध्या त्यांच्या शांतता रॅलीसाठी कोल्हापूरात आहेत. आज कोल्हापूरात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, त्यांच्यामागे कोण आहे? त्यांना पैसे कोण पुरवतो? यासरख्या प्रश्नांवर भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले जरांगे पाटील?

शांतता रॅलीसाठी कोल्हापूरात आलेले मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "आता राज्यात समाजातील गोरगरिबाच्या लाट आली आहे. अशी लाट गेल्या 70 वर्षात कुणीही पाहिलेली नाही. मराठा आंदोलन हे देशात असे पहिलेच आंदोलन आहे जे सलगपणे चालू आहे.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, " या काळात माझी चौकशी करण्यासाठी सरकारने ड्रोनही पाठवलेले होते. गेल्या 11 महिन्यात माझ्यावर त्यांची नजर आहे. या आंदोलनासाठी माझ्या मागे कोण आहे? मला पैसे कोण पुरवतो? यावरही त्यांची सतत नजर असते."

शांतता रॅली

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास काही ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यामुळे राज्यात मराठा समाज आणि ओबीसींमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सामाजिक सलोख कायम राहावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर शांतता रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे.

सात जिल्ह्यांचा दौरा

मराठवाड्यातील शांतता रॅलीच्या पहिल्या टप्प्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये ते शांतता रॅली काढत आहे. त्यांच्या या शांतता रॅलीला 7 ऑगस्टपासून सोलापुरातून सुरूवात झाली होती. सोलापूरनंतर सांगली आणि कोल्हापूरात त्यांची शांतता रॅली झाली.

आता त्यांची रॅली रविवारी 11 ऑगस्ट रोजी पुण्यात असणार असून, त्यानंत ते अहमदनदरमध्ये रॅली काढणार आहेत. नाशिकमधून पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीचा समारोप होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT