Madina  E sakal
महाराष्ट्र बातम्या

अजान का म्हंटली जाते? लाऊडस्पीकरची काय गरज?

सुप्रीम कोर्टाने कुठल्याही धर्म आणि धार्मिक परंपरांचा नाही, तर नागरिकाच्या शांततेत जगण्याच्या आधिकाराचा विचार निकालपत्रात मांडलाय

हलिमाबी कुरेशी

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून मशिदीवरील भोंग्यावरुन वाद सुरुय, मशिदीवरील लाऊडस्पीकर विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिलाय. यावरुन सध्या सामाजिक तणावाची स्थिती निर्माण झालीय. या लेखात अजान का दिली जाते याबद्दल माहीती जाणून घेऊयात.

अजान म्हणजे काय?

अजान म्हणजे नमाजची वेळ झालीय, नमाजसाठी चला हे सांगण्यासाठीचा कॉल, बुलावा असतो. इस्लाममध्ये नमाजला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवसभरात ५ वेळा नमाजपठण कर्तव्य मानलं जातं.जास्तीत जास्त लोकांपर्यंत नमाजच्या वेळेची माहीती पोहोचावी यासाठी अजान दिली जाते.

अजान देण्याची सुरुवात कशी झाली-

इस्लाम धर्माचा उद्य झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मदीन्यात नमाजसाठी लोक येत, तेव्हा मात्र वेळ लक्षात येत नसे. अनेकांनी ही समस्या सांगितल्यानंतर, या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर अनेकांनी चर्चसारखी घंटा वाजवण्यात यावी असा सल्ला दिला होता, तर काहींनी एखादं निशाण वर केलं जावं असा सल्ला दिला. पण हजरत उमर यांनी अजान दिली जावी असा सल्ला दिला. या प्रसंगाचा उल्लेख 'हदीस' मध्ये (बुखारी) ५७८ मध्ये आढळतो.

मुस्लिम एकेश्वर मानतात. या अजानमध्ये तुम्ही नमाजसाठी चला, नमाजची वेळ झालीय हे सांगितले जातं. अजान मुआज्जीन देतात, मुआज्जीन पाच वेळा अजान देणारी व्यक्ती असते. भोंगे नव्हते त्या काळात अजाण देण्यासाठी उंच जागेवर जाऊन अजान मोठ्याने दिली जायची. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजान पोहोचावी. पण लाऊडस्पीकर आल्यानंतर मात्र उंच जागेवर जाऊन अजान देणं हळूहळू बंद झालं. भारतात साधारणत: १९२० च्या दरम्यान आजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर सुरु झालाय. अजानमध्ये प्रेषित पैंगबरांची स्तुती आणि नमाजसाठी या असं म्हंटलं जातं. अजान अरेबिक भाषेत दिल्ली जाते. अजान साधारणत: २ ते २.५ मिनिटांची असते. पुण्याचे जमाते इस्लामीचे करिमुद्दीन शेख यांनी ही माहीती दिलीय.

सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमानुसार लाऊडस्पीकर वापरले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी सकाळ ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केलीय.तसेच जमाते इस्लामीकडून 5 वर्षांपासून मस्जिद परिचय हा उपक्रम राबविला जातोय. यात अजान, नमाज आणि मशिदीतील उपक्रमांविषयी माहीती दिली जात असल्याचं त्यांनी सांगितली.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय-

18 जुलै 2005 मध्ये लाऊडस्पीकर संदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. या निकालपत्रात नागरिकांच्या अधिकारांविषयी बोलताना जबरदस्तीने कुठल्याही प्रकारचा गोंगाट, आवाज लादला जावू नये याला महत्व दिलंय. कुठल्याही धर्म आणि धार्मिक परंपरांचा नाही, तर नागरिकाच्या शांततेत जगण्याच्या आधिकाराचा विचार निकालपत्रात मांडण्यात आलाय. गोंगाटापासून मुक्तता हा जगण्याच्या मुलभूत अधिकार आहे. भारतीय घटनेच्या कलम २१ चा आधार घेत न्यायलयाने मूलभूत अधिकारांतर्गत हा निकाल दिलाय. त्यामुळे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच लाऊडस्पीकरच्या वापराला परवानगी देण्यात आलीय.

सण-उत्सवांच्या काळात जास्तीत जास्त १५ दिवस नियम शिथिल करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे देण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत परनावगी गरजेची आहे. रात्री १० नंतर केवळ एखाद्या बंद हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमातील वापर, ज्यात शेजाऱ्यांनाही त्रास होणार नाही, असा वापर करण्याला परवानगी दिली. उदा. बंद हॉलमधील कार्यक्रम, ऑडीटोरियम, कॉन्फरन्समधला वापर. तसेच आपातकालीन परिस्थितीत लाउडस्पीकरचा वापर कधीही करता येईन, असही न्यायालयाच्या निकालपत्रात म्हंटलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT