Sambhaji Bhide and Yashomati Thakur  
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्र अशांत करण्यासाठी संभाजी भिडेंना अभय देताय का? यशोमती ठाकुर यांचा सरकारला सवाल

रवींद्र देशमुख

मुंबई - शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. संभाजी भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधीविषय़ी वादग्रस्त विधान केलं आहे. यावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये जातीय वादी तंटे वाढवण्यासाठी सगळ्या गोष्टी होत आहेत का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना का अभय देतायत? महाराष्ट्राची शांतता संपवायची का ? असा सवालही त्यांनी केला.

सरकार संभाजी भिडेंना अभय का देतय?, असा सवाल करत पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी असं काही करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र बघुन घेईन, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.

महात्मा गांधी यांचे वडील जमीनदार होते. मात्र त्यांचे वडील हे मुस्लीम होते, असं वादग्रस्त विधान भिडे यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

Pune News: पुणे, पिंपरीतील ५९ ‘आरएमसी’ प्रकल्पांना टाळे; हवेत विष कालविल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई!

Palghar News: जलमार्गाने प्रवास सुखकर! 'जलसार ते मारंबळपाडा'दरम्यान एक लाख प्रवाशांचा टप्पा पार

Sangrampur News: संग्रामपुरात आदिवासींची होळी; भोंगर्‍या बाजाराने रंगला सातपुडा, होळीची काय आहे लोककथा?

SCROLL FOR NEXT