Sambhaji Bhide and Yashomati Thakur  
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्र अशांत करण्यासाठी संभाजी भिडेंना अभय देताय का? यशोमती ठाकुर यांचा सरकारला सवाल

रवींद्र देशमुख

मुंबई - शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. संभाजी भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधीविषय़ी वादग्रस्त विधान केलं आहे. यावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये जातीय वादी तंटे वाढवण्यासाठी सगळ्या गोष्टी होत आहेत का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना का अभय देतायत? महाराष्ट्राची शांतता संपवायची का ? असा सवालही त्यांनी केला.

सरकार संभाजी भिडेंना अभय का देतय?, असा सवाल करत पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी असं काही करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र बघुन घेईन, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.

महात्मा गांधी यांचे वडील जमीनदार होते. मात्र त्यांचे वडील हे मुस्लीम होते, असं वादग्रस्त विधान भिडे यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT