aai kuthe kay karte
aai kuthe kay karte 
मनोरंजन

'आई कुठे काय करते' मालिकेतून 'हा' प्रसिद्ध कलाकार घेणार ब्रेक

स्वाती वेमूल

या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहचलं आहे. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. यातील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. मात्र आता मालिकेतील एक लोकप्रिय कलाकार काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याचं समजतंय. हा कलाकार आहे यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख Abhishek Deshmukh.

मालिकेच्या कथानकानुसार यश हा परदेशी जाणार आहे. त्यामुळे काही काळासाठी तो या मालिकेत दिसणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. अभिनेता अभिषेक देशमुख याने मालिकेत अरुंधतीच्या मुलाची भूमिका साकारली आहे. यश सध्या लंडनमध्ये असून त्याने मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. म्हणूनच मालिकेच्या कथानकात तो परदेशी गेल्याचं दाखवणार आहेत.

अभिषेक खऱ्या आयुष्यात विवाहित असून त्याची पत्नी कृतिका देव हीसुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिषेक आणि कृतिका २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकले. अभिषेकची ऑफस्क्रीन बहीणसुद्धा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अमृता देशमुख असं तिचं नाव आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर ही अरुंधतीची भूमिका साकारत आहे. तर मिलिंद गवळी अनिरुद्धच्या भूमिकेत आहेत. मालिकेत संजनाची नकारात्मक छटा असलेली भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT