bollywood actor anupam kher  Team esakal
मनोरंजन

मुंबईत आजही मी भाड्याच्या घरात राहतो- अनुपम खेर

"मुंबईत हक्काचं एकही घर नाही"

स्वाती वेमूल

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की आलिशान घरं, महागड्या गाड्या अशी संपत्ती असेल असं सर्वसामान्य गृहीत धरतात. पण ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर Anupam Kher यांच्याबाबतीत असं नाहीये. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी सांगितलं की, मुंबईत त्यांचं हक्काचं एकही घर नाही. ते सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांच्या मालकीचं एकच घर शिमलामध्ये असून ते आई दुलारी खेर Dulari Kher यांच्यासाठी घेतल्याचं अनुपम यांनी सांगितलं. "माझं मुंबईत मालकीच एकही घर नाही. मी भाड्याच्या घरात राहतो. चार-पाच वर्षांपूर्वीच मी मुंबईत घर न घेण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या हक्काचं एकच घर शिमल्यात आहे. चार वर्षांपूर्वी मी ते घर आईसाठी घेतलं होतं", असं ते म्हणाले.

अनुपम यांची आई दुलारी या शिमलामध्ये अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहिल्या होत्या. तिथे हक्काचं घर असावं अशी त्यांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. शोघीमध्ये दुलारी यांना एक घर फार आवडलं होतं. बाहेरून प्रवेशद्वार असलेलं ते एक छोटंसं घर पुढे होतं. मात्र पुढे त्याला नऊ बेडरुम होते. आईला काहीतरी अनोखी भेट द्यावी अशी अनुपम खेर यांची इच्छा होती. घराच्या मालकाला त्यांनी विचारलं की संपूर्ण घर ते विकायला तयार आहेत का? आईला नंतर त्यांनी इतरही खोल्या दाखवल्या आणि त्यांना ते घर खूप आवडलं. तेव्हा अनुपम यांनी आईला सांगितलं की त्यांनी संपूर्ण घर विकत घेतलं आहे. त्यावर "तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? मला इतकं मोठं घर नकोय", असं म्हणत त्या अनुपम खेर यांच्यावर ओरडल्या.

अनुपम खेर हे सध्या अमेरिकेत 'जिंदगी का सफर' या शोची शूटिंग करत आहेत. या शोमध्ये ते चित्रपटसृष्टीतील त्यांचा अनुभव सांगतात. नुकतंच त्यांनी करिअरमधील ५१९ व्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. 'शिव शास्त्री बल्बोआ' असं या चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये नीना गुप्ता यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT