मनोरंजन

'खूप काही सहन केलं आतापर्यत, जर बोलली तर'...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या अदाकारीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून रविना टंडनचे नाव घ्यावे लागेल. रविना ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. शाहरुखच्या मुलाला आर्यनला जेव्हा एनसीबीनं अटक केली होती. तेव्हा आर्यनला पाठींबा देण्यात रवीनानं पुढाकार घेतला आहे. आता ती तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्याचे नाव आरण्यक असे आहे. त्यानिमित्तानं साधलेल्या संवादात आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल रवीनानं सांगितलं आहे. आरण्यकमध्ये तिनं कस्तुरी डोंगरा नावाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. बॉलीवूडमध्ये काम करताना आपल्याला ज्या वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं त्याविषयी रविनानं यावेळी माहिती दिली आहे.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रविनानं सांगितलं की, मला आतापर्यत इंडस्ट्रीमध्ये फार वेगळ्या प्रकारची माणसं भेटली. त्यांच्याकडून खूप त्रास झाला. प्रत्येकाचा स्वभाव ओळखणं, त्यानुसार त्याच्याशी वागणं हे दरवेळी शक्य होत असं नाही. तेव्हा खूप मानसिक त्रास होतो. आपण इतरांशी कितीही चांगलं वागलं तरी देखील आपण त्यांच्यादृष्टीनं वाईटच असतो. हा अनुभव मला मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करताना आला आहे. कुणाचे नाव घेऊन वाद निर्माण करणं हे काही स्वभावात नाही. मात्र कुणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सहन करणार नाही. अद्याप मी काहीही बोलले नाही.

मला आतापर्यत अशा काही व्यक्ती भेटल्या आहेत ज्या समोर एक आणि पाठीमागे वेगळ्या प्रकारे वागतात. मला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडला तर मी त्या व्यक्तीला आपलं मानते. मात्र इंडस्ट्रीमध्ये चित्र फार वेगळे आहे. त्याचा अनुभव घेतला आहे. आपण जसे आहोत तसं जग नाही. हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे कुणाला किती महत्व द्यायचे हे देखील आपल्याला समजायला हवे. जगण्यासाठी आपण दुसऱ्यांशी किती प्रामाणिक आहोत ही भावना महत्वाची आहे. असेही रवीनानं यावेळी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT