मनोरंजन विश्वाचा (tv entertainment) सगळ्या घडामोडी या मुंबापुरीतून (bollywood) घडतात हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. हिरो व्हायच्या निमित्तानं देशभरातील कित्येक कलाकार आपला प्रांत सोडून मुंबईत आले. आणि हिरो झाले. आता ते देशातील आघाडीचे कलाकार (Bollywood actor) आहे. मुंबई आणि परप्रांतीय असा भेद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत. मात्र त्यातील काही कलाकारांनी आम्हाला अजून मुंबईनं (Mumbai) आपलं म्हणून स्वीकारलं नसल्याची खंत व्यक्त केली आहे. सध्या रंजिश है सहीचे (Ranjish Hi Sahi) दिग्दर्शक पुष्पदीप Pushpdeep Bhardwaj) यांची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींबाबत खुलासा केला आहे. (Bollywood new movie ranjish hai sahi director pushpadeep bhardwaj interview)
पुष्पदीप भारद्वाज (Pushpadeep Bhardwaj) यांची रंजिश है सही (ranjish hai sahi) नावाची मालिका नुकतीच प्रदर्शित झाली आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांना या मालिकेची उत्सुकता होती. त्याच्या ट्रेलरला देखील त्यांची पसंती मिळाली होती. आता ही सीरिज प्रदर्शित झाली असून त्यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल पुष्पदीप यांनी एका वेबसाईटला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी आऊटसायडर्स आणि मुंबई यावर मनमोकळेपणानं मत व्यक्त केलं. गेली 14 वर्षे आपण मुंबईमध्ये स्ट्रगल करतो आहे. पण मुंबईनं आम्हाला स्विकारलेलं नाही.
प्रांतवादाचा विषय नाही. आपल्याला मोठं व्हायचं आहे. मोठी स्वप्नं आहेत. ती घेऊन आमच्यासारखे अनेक कलावंत मुंबईमध्ये आले आहेत. त्यांना मुंबईनं स्विकालेलं नाही. याची खंत वाटत असल्याचे पुष्पदीप यांनी म्हटलं आहे. मी आजवर मोठा संघर्ष केला आहे. मला माझ्या स्वतंत्र प्रोजेक्टसाठी 14 वर्षे वाट पहावी लागली. त्यानंतर मला कुठं मोठा प्लॅटफॉर्म मिळाल्याचे दिग्दर्शकानं सांगितलं आहे. या चित्रपटामध्ये रिया चक्रवर्ती लीडरोलमध्ये आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.