Dilip kumar,Saira Banu file image
मनोरंजन

दिलीप कुमार यांच्या एका निर्णयामुळे खचल्या होत्या सायरा बानो

दिलीप कुमार यांच्या प्रत्येक सुख-दु:खात सायरा बानो खंबीरपणे त्यांच्या बाजूला उभ्या होत्या.

स्वाती वेमूल

अभिनय व सौंदर्याच्या बळावर अभिनेत्री सायरा बानो यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटात त्यांना शम्मी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती. कलाविश्वातील प्रवासासोबतच खासगी आयुष्यामुळेही सायरा बानो चर्चेत होत्या. अभिनेते दिलीप कुमार यांच्याशी त्यांनी लग्न केलं. लग्नबंधनात अडकताना सायरा या २२ वर्षांच्या होत्या. १९६६ मध्ये दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी लग्न केलं. दिलीप कुमार यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सायरा या त्यांच्या एका निर्णयामुळे खूप खचल्या होत्या.

नात्यात सर्व सुरळीत सुरू असताना सायरा बानो यांच्या आयुष्यात एक वादळ आलं. १९८२ मध्ये दिलीप कुमार यांनी अस्मा साहिबा यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांच्या या निर्णयामुळे सायरा फार खचल्या होत्या. त्यातही अस्मा यांच्यासोबत लग्न केल्याचं दिलीप कुमार यांनी बरेच दिवस सर्वांपासून लपवलं होतं. त्यांचं हे दुसरं लग्न फार काळ टिकलं नाही. अस्मा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर दिलीप कुमार यांनी पुन्हा सायरा बानो यांची साथ दिली.

सायरा यांनी जेव्हा दिलीप कुमार यांना प्रपोज केलं, तेव्हा त्या २२ वर्षांनी लहान होत्या. त्यावेळी दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या प्रत्येक सुख-दु:खात सायरा बानो खंबीरपणे त्यांच्या बाजूला उभ्या होत्या. वृद्धापकाळातील आरोग्याच्या समस्या जाणवताना सायरा यांनी दिलीप कुमार यांची देखभाल केली. सायरा या सावलीप्रमाणे कायम त्यांच्यासोबत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT