मनोरंजन

Budget 2021: अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्राच्या तोंडाला पुसली पाने

स्वाती वेमूल

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला असून त्यांनी अर्थसंकल्पात जवळपास प्रत्येक क्षेत्रासाठी काहीतरी जाहीर केलं. मात्र जवळपास एक तास 49 मिनिटांच्या भाषणात त्यांनी मनोरंजन क्षेत्राचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही. आधीच करोनाच्या महामारीमुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका सहन करावा लागला होता. अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत, तर चित्रपटगृहे बंद असल्यामुळे अनेक निर्मात्यांचे नुकसानही झाले. त्यामुळे किमान अर्थसंकल्पातून तरी या क्षेत्राला थोडाफार दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यातही मनोरंजन क्षेत्राची निराशा झाली आहे. 

करमणूक कर कमी करण्याची मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली जात होती. जीएसटी आणि अर्थसंकल्पात करमणूक कर कमी करण्याची मागणी वारंवार केली गेली, मात्र याकडेही साफ दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं. "दुर्देवाने अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्राचा उल्लेखच झाला नाही. पण किमान कोणतंही अधिकचं ओझंसुद्धा टाकलं गेलं नाही हे बरं झालं. करोनामुळे मनोरंजन क्षेत्राला खूप मोठा फटका बसला आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असतील अशी मी अपेक्षा करतो," अशी प्रतिक्रिया चित्रपट प्रदर्शिक अक्षय राठी यांनी 'पिंकविला'शी बोलताना दिली. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ११ वाजता सुरु केलेलं अर्थसंकल्प वाचन १२ वाजून ५० मिनिटांनी थांबवलं. अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजारात मोठी उसळी पहायला मिळाली.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

finance minister nirmala sitharaman ignores entertainment industry during budget 2021

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT