Hanuman Jayanti Special 
मनोरंजन

Hanuman Jayanti Special : 'लोकांनी घरात फोटो लावले, भेटल्यावर पाया पडले! ते पाहून दारासिंह यांनी कधीच...'

रामानंद सागर यांच्या रामाय़ण मालिकेमध्ये हनुमानाची भूमिका प्रसिद्ध अभिनेते दारा सिंह यांनी केली होती.

युगंधर ताजणे

Hanuman Jayanti Special Ramayan Tv serial Ramanand director : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका रामायण आणि महाभारत यांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर कित्येक काळ अधिराज्य केले आहे. ९० च्या दशकांत या मालिकांनी भारतीय प्रेक्षकांवर केलेलं गारुड अद्याप कायम असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात सर्वाधिक चर्चा होती ती रामायणाची. या मालिकेत काम करणारे कलाकार हे नेहमीच चाहत्यांच्या मनात घर करुन राहिले आहेत.

रामानंद सागर यांच्या रामाय़ण मालिकेमध्ये हनुमान यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते दारा सिंह यांनी केली होती. अमर उजालानं त्यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून साधलेला संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांनी आपल्याला ज्यावेळी हा रोल ऑफर झाला त्यानंतर वैयक्तिक आयुष्यामध्ये घेतलेले त्यांनी निर्णय याविषयी सांगितले आहे. माझी निवड हनुमान यांच्या व्यक्तिरेखेसाठी झाला तेव्हा त्याचे खूप नवल वाटले. त्याचा आनंदही झाला.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

रामानंद सागर यांची रामायण नावाची मालिका ही आज देखील लोकप्रिय आहे. त्यातील कलावंतांची नेहमीच चर्चा होत असते. या मालिकेमध्ये भगवान हनुमान यांची भूमिका दारासिंह यांच्या वाट्याला आली होती. त्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाचे कौतूकही झाले. चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षावही केला होता. त्यानंतर रामायणावर आधारित बऱ्याचशा मालिका आल्या. पण रामानंद सागर यांची निर्मिती असलेली रामायण आणि दारा सिंह यांनी रंगवलेली हनुमानजी यांची व्यक्तिरेखा हे सारं प्रचंड लोकप्रिय झालं.

दारा सिंह यांचे चिरंजीव विंदू दारासिंह यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, दारा सिंह यांनी जोपर्यत रामायण मालिकेचे शुट संपत नाही तोपर्यत नॉनव्हेज खाणं सोडून दिलं होतं. कारण रामायण मालिकेचे शुट संपल्यानंतर बरेचसे लोक त्यांच्या पाया पडण्यासाठी थांबायचे. वडिलांसाठी ही सर्वात मोठी पावती होती. हनुमान यांच्या भूमिकेनं दारासिंह हे एवढे लोकप्रिय झाले होते की, प्रेक्षक त्यांनाच हनुमान समजून त्यांची पुजा करायचे.

Hanuman Jayanti Special

तो काळ असा होता की, बऱ्याचशा मंदिरांमध्ये त्यांचे फोटो भिंतीवर लागले होते. लोकांचे त्यांच्या प्रती असलेले प्रेम यामुळेच की काय त्यांनी पुढे मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला. लोकं आपल्या पाया पडतात. त्यांचे आपल्याला मिळणारे प्रेम, त्यांची भक्ती हे सारं काही भारावून टाकणारं होतं. त्यामुळेच की काय आपण शेवटपर्यत मांसाहार करणार नाही. असा निर्णय दारासिंह यांनी घेतल्याचे त्यांच्या मुलानं त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

अमृता खानविलकरला करायचंय 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये काम; म्हणाली- तिचं पात्र साकारणं हेच...

Vidhan Bhavan lobby clash Video: मोठी बातमी! विधानभवनाच्या लॉबीत राडा; पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

'मेल्यानंतर तरी मला न्याय द्या' अभिनेत्याच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीने व्हिडिओ शेअर करत केले गंभीर आरोप, जीवन मृत्यूंशी देतेय झुंज

SCROLL FOR NEXT