ikram akhtar writer arrest from salman khan ready due to fraud of 1.5 crore case  SAKAL
मनोरंजन

Ikram Akhtar: सलमान खानच्या सिनेमाचा लेखक इकराम अख्तरला अटक, बांधकाम व्यावसायिकाने केला मोठा आरोप

सलमानच्या सिनेमाच्या लेखकाने बांधकाम व्यावयायिकाची केली फसवणुक

Devendra Jadhav

Ikram Akhtar Arrest News: इकराम अख्तर या बॉलिवूडमधल्या लोकप्रिय लेखकाला अटक करण्याची घटना समोर आलीय. इकराम याने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आलीय.

सलमान खानचा चित्रपट 'रेडी', टायगर श्रॉफचा 'बागी' आणि अजय देवगणचा 'प्यार तो होना ही था' यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटांचं लेखन इकराम अख्तर यांनी केलीय.

इकराम यांना 22 सप्टेंबर 2023 पर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावण्याच आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याविरुद्ध सुमारे दीड कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण

मुरादाबाद येथील बांधकाम व्यावसायिक कुलदीप कात्याल यांनी इकराम अख्तरवर 'आय लव्ह दुबई' चित्रपट बनवण्यासाठी त्याच्याकडून सुमारे दीड कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. पैसे घेतले पण इकराम अख्तर यांनी चित्रपट पूर्ण केला नाही.

पुढे बांधकाम व्यावयायिकाने दबाव टाकल्याने इकरामने दीड कोटी रुपयांचे चेक बिल्डरला दिले पण ते बाऊन्स झाले. यानंतर कुलदीपने 2016 मध्ये इकरामविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. हा खटल्याचा निकाल लागला असुन इकरामला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलीय

इकराम अख्तर यांची बॉलिवूड कारकीर्द

इकराम अख्तर हे हिंदी चित्रपट उद्योगातील पटकथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. त्याची 'इकराम अख्तर अॅक्टर फॅक्टर्स' नावाची एक अभिनय संस्थाही आहे.

'आय लव्ह दुबई' या चित्रपटाचं दिग्दर्शक त्यांनी केलीय. त्याचबरोबर 'रेडी', 'थँक्यू', 'नो प्रॉब्लेम', 'नई पडोसन', 'चलो इश्क लदाएं', 'जोरू का गुलाम', 'चल मेरे भाई', 'तेरा जादू चल गया' आणि 'छोटा चेतन'. तो चित्रपटांचा लेखक आहे.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT