namkaran
namkaran 
मनोरंजन

अवनीचं पुन्हा नामकरण

सकाळवृत्तसेवा

स्टार प्लसवरील "नामकरण' या मालिकेतून आता मुख्य नायिका अवनी मालिका सोडून जाणार आहे आणि निलांजनाच्या रूपात ती पुन्हा त्याच मालिकेत प्रवेश करणार आहे. त्यानिमित्ताने अवनीची भूमिका साकारणाऱ्या आदिती राठोडशी मारलेल्या गप्पा... 

"ना मकरण' या मालिकेत मी जेव्हा काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्यावर खूपच दडपण होतं. या मालिकेत मी अवनी नावाची मूख्य भूमिका करत होते. जिची आई नाहीय आणि तिच्या सावत्र आईने तिला आपल्या मुलीसारखं वाढवलं आहे. या मालिकेत लहानपणीच्या अवनीची भूमिका अश्रीन नामदार हिने केली होती. तिने अवनी या भूमिकेसाठी प्रेक्षकांची अपेक्षा इतकी वाढवली होती, की मी त्या अपेक्षा पूर्ण करू शकेन की नाही, याची मला शंका होती. तेव्हा प्रेक्षक आमच्या दोघींमध्ये तुलना करायचे, आजही करतात. त्यामुळे मला दडपण आलं होतं. पण मला खात्री होती, की मी हे करून दाखवेन. त्याप्रमाणे मी प्रयत्न केले आणि मोठ्या अवनीवर म्हणजेच माझ्यावरही प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. 

आता या मालिकेत पाच वर्षांची लीप घेतली जाणार आहे आणि अवनी या पात्राचा शेवट होणार आहे. अवनी या पात्राचा शेवट जरी होत असला, तरी मी निलांजना या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. ही भूमिका खूप फ्रेश आहे. यासाठी माझा लूकही बदलण्यात आलाय. पण ही अवनीची भूमिका संपताना मला खूप दुःख होतंय. अवनीने मला खूप शिकवलं आहे. तसंच आदितीनेही अवनीला बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. तेव्हाच स्क्रिनवर अवनीचं पात्र उभं राहू शकलं. 

आमच्यात काही साम्य आहे; तर काही भिन्नता. पण अवनी आणि आदिती एकमेकांना पूरक आहेत. "नामकरण'मधून मला जेहेनबरोबर म्हणजेच नीलबरोबर काम करताना खूप मजा आली. खूप मस्ती- मजा करत आम्ही सीन्स करत असतो आणि केमिस्ट्री तेव्हाच दिसते जेव्हा तुम्ही एकमेकांना सहकार्य करता, एकमेकांना समजता. आमचे जेव्हा एकत्र सीन असतात तेव्हा आम्ही दोघं एकमेकांशी इमोशनली कनेक्‍ट व्हायचो. त्यामुळेच आमच्यात चांगला बॉण्ड तयार झाला. त्यामुळे मला खूपच मजा आली त्याच्याबरोबर काम करायला. 

या मालिकेतून मला महेश भट्ट यांच्याबरोबर काम करायला मिळालं. पण हे स्वप्नवत होतं. भट्‌ट सरांना ही मालिका त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. ही कथा त्यांची आहे. ही मालिका मला करायला मिळेल असं वाटलं नव्हतं. ते जेव्हा कथा वाचून दाखवत असतात, तेव्हा ते तुम्हाला त्यांच्याबरोबर त्या कथेत घेऊन जातात. संपूर्ण सीन तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यामुळे काम करायला सोपं जातं. ते सगळ्यांशी खूप प्रेमाने वागतात, सांभाळून घेतात. एखादा सीन खूप छान झाला तर तुम्हाला स्वतः येऊन "हा सीन खूप छान झाला' असं सांगतात. जर काही चुकलं तरीही तेवढ्याच शांतपणे सांगतात. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. मला या मालिकेसाठी, अवनीच्या भूमिकेसाठी ते योग्य समजले, हेच माझं खूप मोठं भाग्यच मी समजेन. 

शब्दांकन - चिन्मयी खरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT