Nana Patekar Comment On Todays Bollywood celebrity
Nana Patekar Comment On Todays Bollywood celebrity esakal
मनोरंजन

Nana Patekar : 'आजकालचे अभिनेते हे...' नाना पाटेकर पुन्हा बोलले! जुन्या काळातील दिग्गजांच्या आठवणींना दिला उजाळा

युगंधर ताजणे

Nana Patekar Comment On Todays Bollywood celebrity : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. त्याचे कारण त्यांनी दिलेल्या मुलाखती आणि त्यातील सडेतोड विधानं. नाना हे नेहमीच त्यांच्या आक्रमक भूमिका आणि परखड वक्तव्यांविषयी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

येत्या काही दिवसांत नानांचा द व्हॅक्सिन वॉर नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचे दिग्दर्शन द काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. त्याची निर्मिती अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी केली आहे. यापूर्वी अग्निहोत्री यांच्या काश्मिर फाईल्स नावाच्या चित्रपटावरुन मोठा वाद झाला होता. त्यात हिंदू पंडितांवर झालेला अन्याय अन् अत्याचार याविषयी मांडणी करण्यात आली होती.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या

आता द व्हॅक्सिन वॉरच्या निमित्तानं अग्निहोत्री यांनी पुन्हा एका वेगळ्या विषयाची मांडणी केली असून सध्या सोशल मीडियावर त्याचे जोरदार प्रमोशन केले आहे. यासगळ्यात नानांच्या प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. नानांनी प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार, देव आनंद यांचे चित्रपट आणि आठवणींना उजाळा दिला आहे. नानांनी सध्याचे कलाकार आणि त्यांचे स्टारडम अन् बॉक्स ऑफिस याविषयी सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे.

त्या मुलाखतीमध्ये नानांनी देव आनंद, राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या काळाचा उल्लेख केला होता. तो काळ आता संपला. ते स्टारडमही आता दिसत नाही. त्याविषयी असलेलं वेड हे दिसत नाही. सध्याच्या काळात सेलिब्रेटी त्यांचे स्टारडम आठवडाभरात बदलले दिसते.

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या एका शो मध्ये शाहरुखनं आपण सध्याच्या काळातले शेवटचे सुपरस्टार आहोत असे म्हटले होते. त्यामुळे मोठा वाद झाला होता. त्यावरुन नानांना प्रश्न करण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, मला त्या कलाकारांची आठवण येते जे आता आपल्यात नाही. युसूफ साहेब (दिलीप कुमार) यांना कधीही विसरता येणार नाही. याशिवाय देव आनंद, राज कपूर यांच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहणाऱ्या आहेत.

हे सगळे कलाकार आपल्यात नाही. मात्र आपण त्यांच्याविषयी नेहमीच बोलत असतो. आताच्या कलाकारांबाबत तसे बोलू शकत नाही. कारण त्यांचा स्टारडम तसा नाही. बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवरुन कलाकारांचे यश मोजले जाते. त्यामुळेच की काय आपल्याकडे आठवड्याला स्टारडम बदलते. अशी खोचक टिप्पणी नानांनी यावेळी केली.

आमच्यावेळची गोष्ट अशी होती की, आमच्यासारख्या कलाकारांना फारशी संधी मिळत नव्हती. आम्हाला हिरो म्हणून चित्रपटामध्ये संधी मिळणंही कठीण होतं. मी, ओम पूरी, मनोज बाजपेयी, रघुवीर यादव यासारख्या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी योग्य तो प्लॅटफॉर्म फार लवकर मिळाला नाही. आताच्या कलाकारांकडे ओटीटीसारखे नवे माध्यम आहे. असेही नानांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT