nana patekar comment statement on his death funeral during the vaccine war trailer launch SAKAL
मनोरंजन

Nana Patekar: "माझ्या अंत्यसंस्काराची लाकडं तयार आहेत", नाना पाटेकर यांनी मृत्यूविषयी केलं मोठं वक्तव्य

नाना पाटेकर यांनी त्यांच्या मृत्युविषयी मोठं विधान केलंय

Devendra Jadhav

Nana Patekar: नाना पाटेकर हे मराठी, हिंदीच नव्हे तर संपूर्ण भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. नाना पाटेकर सध्या मनोरंजन विश्वापासुन दूर राहून साधी राहणी जगत आहेत.

नाना पाटेकर यांचा बऱ्याच कालावधीनंतर द व्हॅक्सीन वॉर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नाना पाटेकर या सिनेमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. या निमित्ताने एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मृत्यूविषयी मोठा खुलासा केलाय.

(nana patekar comment statement on his death funeral during the vaccine war trailer launch)

माझ्या अंत्यसंस्काराची लाकडं तयार आहेत: नाना पाटेकर

नाना पाटेकरांनी एका मुलाखतीत खुलासा केला त्याप्रमाणे, नाना पाटेकर यांनी त्यांच्या मृत्युसाठी १२ मण लाकडे तयार ठेवली आहेत. ही १२ मण लाकडे सुकी आहेत. ओली लाकडे वापरल्याने खुप धूर होतो ज्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी येईल आणि ते माझ्यासाठी रडत आहेत असा अनेकांचा खोटा समज होईल. असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलं.

माझा फोटो लावू नका, मला विसरुन जा: नाना पाटेकर

नाना पाटेकर यांच्या कुटुंबात सात भावंडे होती. आता त्यापैकी एकही जण या जगात नाही. नाना पाटेकर आईवर प्रचंड प्रेम करायचे. परंतु काही वर्षांपुर्वी त्यांच्या आईचंही निधन झाल.

आता नाना पाटेकर कुटुंबात एकटे आहेत, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे निधनाच्या वेळी कोणताही गैरसमज न होता, माझा फोटोही कोणी लावू नये आणि पूर्ण विसरुन जावे, अशी नाना पाटेकरांची इच्छा आहे.

एकुणच नाना पाटेकरांच्या या विधानाची खुप चर्चा होतेय.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT