Salman Khan Google
मनोरंजन

"सलमान भडकला अनं बोलून गेला; राखीचा नवरा फेक''

बिग बॉस १५ च्या सेटवरील वादातनं महत्त्वाची बातमी आली समोर

प्रणाली मोरे

'बिग बॉस १५' चा सीझन मोठ्या दणक्यात सुरू झाला मात्र ब-यापैकी ओळखीचे चेहरे असूनही सिझनला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मग जुन्यांना काढणं,वादग्रस्त नव्या स्पर्धकांनाआणणं हे वाइल्ड कार्ड एन्ट्री द्वारे सुरू झालं. काहीवेळेला तर जुन्या सिझनमध्ये वादग्रस्त ठरलेल्या स्पर्धकांना पुन्हा नवीन सिझनमध्ये टीआरपी साठी स्पर्धक म्हणून बोलावलं जातं. असाच काहीसा प्रकार यंदा बिग बॉस १५च्या सिझनमध्ये पहायला मिळाला. 'बिग बॉस ओटीटी' मध्ये फर्स्ट रनरअप ठरलेली शमिता शेट्टी हीची 'बिग बॉस १५' मध्ये इतर ओटीटीच्या दोन स्पर्धकांसह पुन्हा वर्णी लागली. हेच कमी होतं म्हणून काय तर बिग बॉस १४ ची स्पर्धक राखी सावंत हिलादेखील शो चर्चेत आणण्यासाठी पुन्हा बोलावणं धाडलं गेलं. इतकंच काय तर आतापर्यंत नुसता राखीच्या तोंडावर ज्याचं नाव होतं आणि प्रत्यक्ष मात्र जो अदृश्य होता असा राखीचा नवरा तब्बल दोन-अडीच वर्षांनी खुद्द 'बिग बॉस १५' मध्ये राखीसोबत प्रगट झालाय ते चक्क स्पर्धक बनून.

Rakhi Sawant And her Husband ritesh

राखी सावंतने आपलं लग्न झाल्याचं अख्ख्या जगासमोर ओरडून-ओरडून सांगितलं पण एकजात तिच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. यावरनं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तिला सोशल मीडियाच्या माध्यमातंन ट्रोल केलं गेलंय. पण माघार घेईल ती राखी कुठली. ती आता-आतापर्यंत सगळ्यांना एकच गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगत राहिली,''माझा नवरा आहे,तो परदेशात कामानिमित्ताने राहतो. आणि वेळ येईल तेव्हा मी त्याचा चेहरा सर्वांना दाखविन''. पण राखीचा मुळत: स्वभाव सगळ्यांना माहीत असल्यामुळे तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. अखेर तो दिवस उजाडला आणि राखी बिग बॉस मध्ये पुन्हा स्पर्धक बनून आली ती थेट आपल्या स्वतःच्या नव-यासोबतच. पण तरीही लोकांनी तिला प्रश्न करायचं सोडलं नाही. राखीचा हा पब्लिसिटी स्टंट आहे,केवळ शो चं रेटिंग वाढावं म्हणून वाहिनीने हे नाटक घडवून आणलं आहे..या आणि अशा अनेक चर्चांना उधाण आलं.

पण आता नेमका राखीचा नवरा फेक आहे की खरा हे बिग बॉस १५ चा होस्ट असलेला अभिनेता सलमान खाननेच स्पष्ट केलंय. त्याचं झालं असं की,बिग बॉस१५ चे स्पर्धक करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे दोघे रीलेशनशीपमध्ये आहेत अशी चर्चा आहे. या दोघांनीही तसं नकळतपणे स्पष्ट केलंय. पण राखीचा नवरा रीतेशने सर्वांसमोर त्या दोघांना सुनावलं की,' तुमचं नातं फेक आहे,तुम्ही फक्त शो साठी असं करताय'. आणि त्याच्या या वक्तव्याला राखीनंही सपोर्ट केला. आणि ते दोघे मग मिळून करण-तेजस्वीला टार्गेट करीत होते. पण या चौघांच्या भांडणात शेवटी सलमाननंही उडी घेतली आणि राखीच्या लग्नाचं गुपित पटकन खुलं केलं.

सलमान खान राखी आणि रीतेशला म्हणाला,''तुम्ही करण-तेजस्वीला काय म्हणताय. तुमच्यात तरी नातं आहे की ते फेक आहे. की शो संपल्यानंतर राखी तुझा नवरा गायब होणार आहे''. आता बघा, दस्तुरखुद्द सलमान खाननेच स्पष्ट केलं की राखीचं लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ. आता समझनेवाले को इशारा काफी है. कितीदिवस प्रेक्षकांनीही स्वतःला वेड बनवत रहायचं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT