मनोरंजन

रकुल प्रीत, राणा दग्गुबातीला ड्रग्ज प्रकरणी ED कडून समन्स

विनायक होगाडे

सक्तवसूली संचलनालयाने म्हणजे ईडीने चार वर्षे जुन्या असलेल्या एका ड्रग्ज प्रकरणामध्ये टॉलीवूडच्या टॉप एक्टर्स आणि डायरेक्टर्सना समन्स जारी केला आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रवि तेजा आणि पुरी जगन्नाथ यांचा समावेश आहे. हे सगळे साऊथ सिनेमाचे लोकप्रिय चेहरे आहेत. या सगळ्यांना एकावेळीच समन्स पाठवण्यात आले आहेत. रकुल प्रीत सिंहला ६ सप्टेंबर, राणा दग्गुबातीला ८ सप्टेंबर, रवि तेजाला ९ सप्टेंबर आणि पुरी जगन्नाथला ३१ सप्टेंबरला ईडीने बोलावलं आहे. या चार वर्षे जुन्या असलेल्या ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 12 लोकांना समन्स पाठवण्यात आले आहेत.

हे प्रकरण तेलंगाणाच्या उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित आहे. या विभागाद्वारे जुलै २०१७ साली एका फेमस बारमध्ये तपासानंतर दाखल करण्यात आलेल्या १२ खटल्यांवर आधारित आहे. या प्रकरणी ११ चार्जशीट दाखल करण्यात आल्या होत्या. रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबती, रवी तेजा किंवा पुरी जगन्नाथ यांची नावे आरोपी म्हणून नाहीयेत. मात्र, ते मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये सामील आहेत की नाही हे आताच सांगणं थोडं घाईचं ठरेल, असं एजन्सीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलंय.

2017 मध्ये तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 30 लाख किमतीचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर 12 गुन्हे दाखल केले होते. 11 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी, आतापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आली आहे आणि 62 जणांची तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने ड्रग्ज प्रकरणी चौकशी केली आहे. यातील ज्यांची चौकशी करण्यात आली आहे, त्यातील अकरा जण फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT