Rani Mukherji Bollywood Actress 54 IFFI Goa Interview
Rani Mukherji Bollywood Actress 54 IFFI Goa Interview  esakal
मनोरंजन

Rani Mukherji : शाहरुखच्या 'त्या' चित्रपटामुळे सगळ्यात जास्त 'घटस्फोट'! राणी मुखर्जीनं सरळ सांगून टाकलं

युगंधर ताजणे

Rani Mukherji Bollywood Actress 54 IFFI Goa Interview : बॉलीवूडमध्ये गेल्या दोन दशकांपासून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या राणीचा चाहतावर्ग मोठा आहे. हिंदी चित्रपट विश्वातील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये राणीचे नाव घेतले जाते. तिनं तिच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. एकाच पठडीतल्या भूमिकांमध्ये अडकून न पडता तिनं तिची वेगळी ओळखही निर्माण केली.

राणी मुखर्जी आणि किंग खान शाहरुख यांच्या जोडीला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली. कुछ कुछ होता है हा या जोडीचा पहिला चित्रपट, पंचवीस वर्षानंतरही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. त्या चित्रपटानं प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवली होती. त्यानंतर चलते चलते, वीर झारा, कभी खूशी गम या चित्रपटातून शाहरुख राणीनं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

९० च्या दशकांतील प्रमुख अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या राणीनं आता शाहरुखविषयी एक बिनधास्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली तिनं शाहरुखच्या त्या चित्रपटावरुन दिलेली प्रतिक्रिया ही खूप काही सांगून जाणारी आहे. राणी ही ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी झाली होती. हा महोत्सव गोव्यात पार पडतो आहे. यावेळी राणीनं तिच्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

चित्रपट महोत्सवातील मास्टरक्लासमध्ये राणीनं तिच्या बॉलीवूडविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राणीनं यावेळी तिच्या आणि शाहरुखच्या कभी अलविदा न कहना या चित्रपटाचा उल्लेख केला. त्याविषयी ती म्हणाली की, हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्यामुळे अनेकांचे संसार मोडले होते. कित्येकांचे घटस्फोट झाले. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आणि त्यांच्या विचारप्रक्रियेत वेगळाच बदल दिसून आला. त्यांनी स्वताला जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला.

कभी अलविदानंतर घटस्फोटाच्या प्रकरणात जास्त वाढ झाल्याचे राणीचे म्हणणे आहे. खरं सांगायचं तर त्यावेळी अशा प्रकारचा चित्रपट तयार कऱणे आणि तो प्रदर्शित करणे ही मोठी धाडसाची बाब होती. निर्मात्यांनी ते धाडस केलं त्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद मोठाच होता. प्रेक्षकांना तो चित्रपट कमालीचा आवडला. त्या चित्रपटात शाहरुख सोबत केलेली सह अभिनेत्रीची भूमिका खूपच प्रभावी ठरली होती. असेही राणीनं यावेळी सांगितले.

कभी अलविदाविषयी आणखी माहिती सांगायची झाल्यास हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात शाहरुख खान, अभिषेक बच्चन, प्रीती झिंटा आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. करण जोहरनं हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. जोडप्यांमधील सुसंवाद, त्यांचे वैवाहिक आयुष्य, त्यातील संघर्ष यावर आधारित हा चित्रपट होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT