Salman Khan esakal
मनोरंजन

Salman Khan: बॉलीवूडच्या भाईजानला मुंबई पोलिसांकडून 'वाय प्लस' सुरक्षा

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता आणखी वाढ करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Salman Khan Mumbai police provide Y+ security: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता आणखी वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे हा पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढे सलमान खानला मुंबई पोलिसांकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाईल. असे सांगण्यात आले आहे.

एएनआयनं केलेल्या ट्विटमध्ये यांसंबंधीची अधिक माहिती देण्यात आली आहे. त्यात सलमानला यापुढील काळात वाय प्लस सुरक्षा देणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सिद्धु मुसेवाला प्रकरणातील आरोपी बिष्णोईकडून सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सुरुवातीला एक निनावी पत्र सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावानं आले होते. यानंतर सलमाननं त्याविषयी मुंबई पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणानं बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

लॉरेन्स बिष्णोईकडून आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचा सलमानच्या घरी पहारा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT