Sarang Sathaye On Toll collection Esakal
मनोरंजन

Sarang Sathaye: रिफंड मिळत नाही म्हणून सारंगने टोलनाक्यावर चक्क १५ मिनिट रोखलं होतं ट्रॅफिक

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बद्दलची सारंग साठ्ये ची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Vaishali Patil

Sarang Sathaye On Toll collection: गेल्या काही दिवसापासून मुंबई-पुणे महामार्गावरील टोलनाका हा चर्चेचा विषय बनला आहे. टोल नाक्यावरुन बराच गदारोळ सुरु आहे. त्यातच मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करतांना अनेकांना नाहक त्रासाला सामोर जावं लागत आहे. इतकच नाही तर काही ठिकाणी तर विनाकारण टोल दोन वेळा घेण्यात येतो.

या महामार्गावरून जातांना जर रस्त्यात काही कामासाठी लोणावळ्याला थांबले तर जास्तीचा किंवा दुप्पट टोल घेतला जातो. यामुळे सर्वसामान्य माणसांसोबत अनेक कलाकारांचाही विनाकारण मनस्ताप होतो. काही दिवसांपासून काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत यावर टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी यावर टीकाही केली होती.

आता त्यातच आणखी एका मराठमोळ्या कलाकारानं पोस्ट शेयर करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे तो म्हणजे सारंग साठ्ये. सारंग हा प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो. त्याला देखील मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास करतांना अशाच प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागला.

याबद्दल त्याने ट्विट करत लिहिले की, "हे लोणावळ्यात नेहमीच घडत. महामार्गावरून प्रवास करताना रिफंड मिळविण्यासाठी 15 मिनिटे ट्रॅफिकमध्ये थांबावं लागले. नक्कीच हा कोणत्यातरी प्रभावशाली व्यक्तीचा टोल नाका असावा. याबाबत यापुर्वी अनेकांनी हा मुद्दा उपस्थीत केला आहे त्यामुळे राज्य सरकारनं याकडे गाभीर्यांने लक्ष द्यावे."

ही पोस्ट शेयर करतांना त्याने राज्य सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आहे.

Sarang Sathaye On Toll collection:

दुसऱ्या वृत्तसंस्थेसोबत बोलतांना त्याने सांगितलं की, "अनेकदा टोल प्लाझावर काम करणारे अधिकारी हे तेथील फास्ट टॅग काम करत नसल्याचं सांगतात. त्यामुळे प्रवासात घाईत असणारी लोक तिथे रोखीने पैसे भरतात मात्र त्यानंतर जवळपास दोन-तीन तासांनंतर मेसेज येतो की फास्टटॅगद्वारे टोलची रक्कम कापली गेली आहे. असं माझ्यासोबतही घडलं आहे."

काही दिवसांपुर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार ऋजुता देशमुख आणि कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी देखील टोलनाक्यावर दोनदा टोल भरावा लागल्याने संताप व्यक्त करत पोस्ट शेयर केली होती.

त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानचा टोलनाका आता पुन्हा चर्चेत आहे. या प्रकरणाकडे सरकार लक्ष देते का आणि काही कार्यवाही करण्यात येईल का असे अनेक प्रश्न नेटकरी या पोस्टच्या कमेंटमध्ये विचारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane : शहराचे नाव बदलण्याचे षड्‍यंत्र; मंत्री नीतेश राणेंची शिवसेना यूबीटीवर टीका

Viral Video : तरुणीची मदत करणे तरुणाला चांगलेच पडले महागात, तुम्ही देखील 'ही' चूक करु नका; पाहा नेमकं काय घडलं ?

हुंडाबळी प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा, सून ५ महिन्यांनी सापडली पुण्यात; पोलिसांनी घेतली ताब्यात

Kolhapur Airport : भाजप सरकारच्या धोरणांमुळे कोल्हापूर विमानतळाची झेप; सात वर्षांत साडेसात लाखांहून अधिक प्रवासी

Education News : निवडणुकीच्या रणधुमाळीत एमपीएससीची परीक्षा; प्रचाराच्या रॅलींमुळे परीक्षार्थींची मोठी तारांबळ

SCROLL FOR NEXT