actress barot marry 
मनोरंजन

रिस्क है तो ईश्क है': स्कॅम 1992 मधील अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - सध्या चित्रपटांपेक्षा जास्त बेव सिरीजला लोकप्रियता मिळत आहे. अशीच एक लोकप्रिय आणि सुपर हिट असलेली वेब सिरीज म्हणजे 'स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी'. या वेब सिरीजच्या कथानकामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ही वेब सिरीज खुप गाजली.

बसिरीजमधील रिस्क है तो ईश्क है हा डायलॉग खूप गाजला. हा डायलॉग अंजली बरोत या अभिनेत्रीच्या तोंडी आहे. अंजलीने या वेब सिरीजमध्ये हर्षद मेहताची पत्नी ज्योती मेहताची भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. 

अंजली नुकतीच गौरव अरोरासोबत विवाह बंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते. १६ फेब्रुवारीला अंजलीने रिस्क है तो ईश्क है लिहिलेला टी शर्ट घालून फोटो पोस्ट केले होते.

गौरव आणि अंजलीच्या लग्नात श्रेया धन्वंतरीने हजेरी लावली होती. श्रेया ही अंजलीची स्कॅम 1992 वेब सिरीजमधील सहकलाकार आहे. श्रेयाने या वेब सिरीजमध्ये पत्रकार सुचिता दलालची भूमिका केली होती. तिच्या सोबत या वेब सिरीजमधील अभिनेते जेमिनी पाठक हे देखील या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

नवविवाहीत जोडप्याचे लग्नातील व्हिडीओ श्रेयाने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या व्हिडीओमध्ये अंजली आणि गौरव यांची लग्न मंडपात 'बल्ले बल्ले जी सोनियादे रंग' या गाण्यावर एन्ट्री होताना दिसत आहे. यावेळी अंजलीने लाल रंगाचा लेहंगा घातला होता आणि गौरवने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT