sagar sarhadi 
मनोरंजन

'चांदनी', 'कहो ना प्यार है'सारख्या चित्रपटांचे लेखक सागर सरहदी काळाच्या पडद्याआड

स्वाती वेमूल

प्रसिद्ध पटकथा लेखक, संवाद लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांचं निधन झालं. फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्तम पटकथालेखकांमध्ये त्यांची गणना होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. मुंबईतील सायन इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 'कभी कभी', 'चांदनी', 'सिलसिला', 'कहो ना प्यार है' यांसारख्या चित्रपटांची पटकथा त्यांनी लिहिली होती. 

सागर सरहदी यांचा जन्म ११ मे १९३३ रोजी पाकिस्तानात झाला. एबटाबादला सोडून ते दिल्लीतील किंग्सवे कँपमध्ये राहायला आले. नंतर ते मुंबईत स्थायिक झाले. कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं. त्यांना यश चोप्रा यांच्या 'कभी कभी' या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात राखी आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील संवादलेखनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता. 'बाजार' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. यामध्ये स्मिता पाटील, फारूख शेख आणि नसीरुद्दीन शाह प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाची निर्मिती आणि लेखनसुद्धा त्यांनीच केलं होतं. 

सागर सरहदी यांनी 'नूरी', 'सिलसिला', 'चांदनी', 'रंग', 'जिंदगी', 'कर्मयोगी', 'कहो ना प्यार है', 'कारोबार', 'बाजार', 'चौसर' यांसारख्या हिट चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अभिनेते जॅकी श्रॉफ, दिग्दर्शक हंसल मेहता यांसोबतच इतर कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT