Shah Rukh Khan had a tonne of fun at his own wedding.
Shah Rukh Khan had a tonne of fun at his own wedding. Google
मनोरंजन

'बुरखा घाल,नमाज पढ';शाहरुखच्या घरात गौरीवर धर्म बदलण्याची झालेली जबरदस्ती?

प्रणाली मोरे

शाहरुख खान(Shahrukh Khan) आणि गौरीचं(Gauri Khan) नातं नवरा बायको म्हणून किती घट्ट आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांची लव्हस्टोरी देखील तितकीच रंजक आहे. तो मुसलमान आणि गौरी हिंदू यामुळे तर अधिकच त्यांच्या लव्हस्टोरीचे किस्से आहेत. शाहरुखनं गौरीशी १९९१ साली लग्न केलं,जेव्हा त्याचं अभिनय क्षेत्रातलं करिअर नुकतंच सुरू झालं होतं. तो आज जितका प्रसिद्ध आहे त्याच्या पावपटही त्याला तेव्हा फारसं कुणी ओळखत नव्हतं. तेव्हा त्याच्या सासरच्या मंडळींना देखील फार काही त्याच्याविषयी माहित नव्हतं. अर्थात अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणूनही शाहरुख कसा आहे याविषयी देखील त्यांना अज्ञान होतं. आणि याचाच फायदा घेतला होता तेव्हा शाहरुखनं. काय केलं होतं त्यानं.

फरिदा जलाल(Farida Jalal) यांच्यासोबतच्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमात शाहरुखला त्याच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा द्यायला सांगण्यात आला. तेव्हा त्यानं आपण आपल्या सासरच्या मंडळींना कसं ट्रोल केलं होतं याचा भन्नाट किस्सा सांगितला होता. कारण त्याच्या सासरच्या काही मंडळींना तो मुसलमान असल्यामुळे गौरींच कसं होणार याविषयी चिंता सतावत होती.

शाहरुख म्हणाला,''मला आठवतंय गौरीचं माहेरंच सगळं कुटुंब आलं होतं. ते सगळे थोडे जुन्या रुढी-परंपरा मानणारे आहेत. आणि मी त्यांचा सगळ्या समजूतींचा रुढी परंपरांचा मनापासून आदर करतो. त्यावेळच्या जुन्या पद्धतीच्या रीसेप्शनमध्ये सगळे असे आमच्या आजुबाजूला गर्दी करून होते. मी तिथे साधारण सव्वा एकच्या सुमारास गेलो. मी पोहोचल्यावर सगळे आपापसात कुजबुजायला लागले. मुसलमान मुलगा आहे..मुलीचं नाव बदलेल का? मुसलमान होईल आपली मुलगी. ते सगळे पंजाबीत कुजबुजत होते. तेव्हा मी लगेच उठलो अन् गौरीला म्हणालो,''गौरी चल,नमाज पठण कर,बुरखा घाल,चला सगळयांनी''. ते ऐकून गौरीच्या सगळ्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. त्यांना वाटलं मी त्यांच्या मुलीला पू्र्ण बदलून टाकणार''.शाहरुखनं पुढे आणखी आपल्या सासरच्यांची मस्करी करताना म्हटलं,''तर पहा,आता यापुढे गौरीला बुरखा घालावाच लागेल. त्याशिवाय ती घराबाहेर पडणार नाही. आणि हिचं नाव बदलून आम्ही आयेशा ठेवू''.

त्यापुढे सांगताना शाहरुख म्हणाला, ''पण या मजामस्करीनंतर माझं आणि गौरीच्या कुटुंबातलं नातं एकदम बदलून गेलं. आणि मी एक गोष्ट शिकलो,आपल्या धर्माचा आदर प्रत्येकानं करा पण आपल्या प्रेमाच्या आड त्याला येऊ देऊ नका. आमच्या लग्नाच्या आठवणी खूप सुंदर आहेत. आणि वर्षागणिक आठवणींसोबत आमचं नातंही घट्ट बनत चाललं आहे. आता खूप बदललं आहे सगळं. आता गौरीपेक्षा जास्त माझ्यावर तिचे सगळे नातेवाईक प्रेम करतात''. शाहरुख आणि गौरीला आर्यन,सुहाना आणि अब्राहम ही तीन मुलं आहेत. शाहरुख लवकरच आपल्याला पठाण आणि डंकी सिनेमातनं दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT