मराठवाडा

महाविध्वंसक भूकंपाला 28 वर्षे, मूलभूत गरजांचे पुनर्वसन कधी?

Killari Earthquake : ३० सप्टेंबर १९९३ साली पहाटे ३.५६ वाजता लातूर जिल्ह्यात किल्लारी इथं भूकंप झाला आणि होत्याचं नव्हतं झालं....

विश्वनाथ गुंजोटे

Killari Earthquake : ३० सप्टेंबर १९९३ साली पहाटे ३.५६ वाजता लातूर जिल्ह्यात किल्लारी इथं भूकंप झाला आणि होत्याचं नव्हतं झालं....

1993 Latur earthquake : किल्लारी (जि. लातूर) : लातूर - उस्मानाबाद जिल्ह्यांत ३० सप्टेंबर १९९३ ला झालेल्या महाप्रलंयकारी भूकंपाला गुरुवारी (ता. ३०) २८ वर्षे पूर्ण होत आहेत. पहाटे झालेल्या ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाने दोन्ही जिल्ह्यांतील बावन्न गावांना हादरा दिला. भूकंपाने अनेकांचे प्राण हिरावले. घरे-दारे नष्ट झाली. क्षणार्धात सर्वकाही होत्याचे नव्हते झाले. शासनाने घरांचे पुनर्वसन केले. मात्र मूलभूत गरजा पुरविण्यात शासन अपयशी ठरल्याची खंत या प्रदीर्घ कालावधीनंतरही कायम आहे. किल्लारीसह भूकंपग्रस्त सर्वच गावांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील तीस खेडी पाणीपुरवठा योजना कायम या ना त्या कारणास्तव विस्कळित राहिली आहे. आजही ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. महिना-दोन महिन्यांनी नळांना पाणी येते. त्यामुळे पाणीप्रश्न कायम आहे.

कबालेंचा प्रश्न कायम

आठव्या आणि नवव्या फेरीतील कबाले (जागेचा मालकी हक्क) वाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. बसस्थानकाची घोषणा झाली; पण ती अधांतरीच आहे. तालुकास्तरीय सर्व शासकीय उपकार्यालये एकत्र असावीत यासाठी खुली जागा राखीव ठेवलेली आहे. तेथे तालुक्यातील विविध शासकीय उपकार्यालये कार्यान्वित व्हावीत, रोजगाराच्या संधीही उपलब्ध कराव्यात, भूकंपग्रस्तांचा शासकीय नोकरीतील अनुशेष भरून काढण्यासाठी कायम ओरड सुरू आहे. हा प्रमुख मुद्दा शासनाने प्राधान्याने मार्गी लावावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

नागरी सुविधांचा अभाव

किल्लारीसह लामजना, मोगरगा, मंगरूळ, गुबाळ, नांदुर्गासह भूकंपग्रस्त अन्य गावांतर्गत रस्ते मुरूम, दगड, मातीचे बनविले होते. त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. आज या रस्त्यांवर चालणेही कठीण आहे. बावन्न गावांतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्याची मागणी कायम आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, खासदार ओमराजे लिंबाळकर यांनी लक्ष घालून या समस्या सोडवाव्यात अशी भूकंपग्रस्तांची माफक अपेक्षा आहे.

भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन झाले; पण अपुऱ्या सुविधांमुळे या भागात येणाऱ्या कर्मचारी वर्गाला ये-जा करावी लागते. मूलभूत गरजांच्या पूर्तीसह शैक्षणिक दर्जा वाढीसाठीही प्रयत्न व्हावेत, उपक्रम राबवावेत.

- सतीश भोसले, मुख्याध्यापक. किल्लारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : 'करो वा मरो' सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI ठरली! वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंसह उतरणार?

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

ड्रग्स प्रकरणात अडकली, संन्यासी होण्याची हौस फिटली ! 25 वर्षांनी अभिनेत्रीचा टीव्हीवर कमबॅक

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Holi 2026 Song: 45 वर्षांनंतरही कायम हिट! होळीच्या या गाण्यात दिसली होती अमिताभ-रेखा यांची भन्नाट केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT