file photo 
मराठवाडा

टंचाइ निवारण्यासाठी ‘एवढ्या’ कोटींचा आराखडा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : आगामी काळात ग्रामीण भागासह नागरी भागात नागरिकांना टंचाइच्या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी सोळा तालुक्याने ४३ कोटी १५ लाख तर नागरी भागातुन एक कोटी दोन लाख असे एकूण ४४ कोटींचा टंचाइ आराखडा तयार केला आहे. हा आराखडात जिल्हा प्रशासनाने नुकताच विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.

टंचाइ आरखडे सादर
मार्च महिन्याची चाहूल लागताच जिल्ह्याला टंचाइच्या झळा जानवु लागतात. याबाबत तालुकानिहाय नियोजन करुन ते शासनाला सादर केले जाते. यंदाही सर्वच तालुक्यांना ता. दहा फेब्रुवारीपर्यंत टंचाइच्या खर्चाबाबत नियोजन करुन प्रशासनाला सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

विभागीय आयुक्तांना आराखडे सादर
जिल्ह्यातील सोळा तालुक्यांचे टंचाइ आराखडे जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर ता. १३ फेब्रुवारी रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी विभागीय आयुक्तांना पाठविले आहे. हा टंचाइ आराखडा विभागीय आयुक्तांकडून राज्य शासनाला पाठविण्यात आल्यानंतर टंचाइतंर्गत खर्चाला शासनाकडून मान्यता मिळते, असे सूत्रांनी सांगितले. 

पाच प्रकारच्या उपाययोजना
यंदा टंचाइच्या कामात नवीन विंधन विहीरी घेणे, नळ दुरुस्ती विशेष योजना, तात्पुरती पुरक नळ योजना, विंधन विहीर दुरुस्ती, खासगी विहीर व कुपनलीका अधिगृहण तसेच टॅँकरने पाणीपुरवठा करणे या बाबींचा सामावेश आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत ३४ कोटी ८६ हजार तर एप्रिल ते जून पर्यंत नऊ कोटी १४ लाख असे एकूण ४३ कोटी १५ लाख ग्रामीण भागासाठी तर नागरी भागासाठी एक कोटी दोन लाख रुपयांचा आराखडा सादर केला आहे.

मागीलवर्षी १६१ टॅंकरने पाणीपुरवठा
मागीलवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे मुखेड, कंधार, लोहा, नांदेड, देगलूर, नायगाव या तालुक्यांसह नांदेड, अर्धापूर व लोहा शहरात टॅंकरणे पाणीपुरवठा करावा लागला होता. यात टंचाइच्या वेगवेगळ्या उपाययोजनावर ३४ कोटींचा खर्च झाला होता. यात ग्रामीण व नागरी भागात एकूण १६१ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीच्या अधीक म्हणजेच १०६ टक्यांनुसार एक हजार १३ मिलीमीटर झाल्यामुळे यंदा टंचाइवर अधीक खर्च होणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

तालुकानिहाय सादर केलेला टंचाइ आराखडा
(रक्कम लाखात)
नांदेड - २.७५, अर्धापूर - १०५.७२, मुदखेड - १२८.३४, भोकर - २१४.९८, उमरी - १७८.०४, हदगाव - ३०३.५२, हिमायतनगर - १५३.९४, बिलोली - २७४.६४, धर्माबाद - ११०.८२, नायगाव - ५०९.१६, देगलूर - १०३.२, मुखेड - ६७८.७, कंधार - ४०८.६२, लोहा - ४००.७, किनवट - ३१६.२६ व माहूर - १६३.५६.

टॅंकर संख्या कमी करण्याचा प्रयत्न
आगामी काळात जिल्ह्याचा दौरा करुन टंचाइचा आढावा घेणार आहे. मागे ज्या ठिकाणी टॅंकर लागले त्या ठिकाणी यंदा टॅंकर लागणार नाहीत यासाठी नियोजन करण्यात येइल. मागीलवर्षी उशिराने पाऊस झाला. तसेच ऑक्टोंबरमध्ये झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पाणी आहे. जमिनीमध्येही जलसंचय वाढल्याने यावर्षी अधीक टंचाइ जानवणार नाही. 

डॉ. विपीन, जिल्हाधिकारी, नांदेड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT