file photo 
मराठवाडा

टंचाई कायमची घालविण्यासाठी ५५७ सार्वजनिक विहिरी

कैलास चव्हाण

परभणी : परभणी येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रस्तावित केलेला टंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासनाने मंजूर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २७ कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांचा आपेक्षित खर्च ग्राह्य धरला आहे. टंचाई कायमची घालवण्यासाठी जिल्ह्यात ४८१ गावे आणि ७६ वाड्यांत ५५७ सार्वजनिक विहिरी होणार आहेत.

परभणी जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई सुरू होते. नागरिकांना राणोमाळ पाण्यासाठी भटकंती करावी लागते.त्यामुळे टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात असतात. त्यासाठी जानेवारी महिन्याच्या सुरवातीला प्रस्तावित आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी पाठविला जातो. त्यानुसार जिल्हा परिषदेने जूनपर्यंतचा तयार केलेल्या आराखड्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये २९७ गावे आणि ५३ वाड्यांत नवीन विंधन विहिरी घेण्याचे प्रस्तावित आहे. 


२७ कोटी ३५ लाख ९५ हजार खर्च अपेक्षित
त्यासाठी दोन कोटी २७ लाख रुपये, १७५ गावे २६ वाड्यांत अशा २०३ विशेष नळ योजना दुरुस्तीसाठी अपेक्षित खर्च पाच कोटी ९९ लाख ५० हजार, तापुरत्या पूरक नळ योजनामध्ये ४८१ गावे व ७६ वाड्यांचा समावेश असून ५५७ योजना आहे. त्यासाठी अपेक्षित खर्च १६ कोटी ५८ लाख ५५ हजार रुपये, ५५ गावे, १४ वाड्या यांच्यासाठी ६९ टॅंकर अपेक्षित असून खर्च दोन कोटी सात लाख रुपये अपेक्षित आहे. खासगी विहीर अधिग्रहणमध्ये ५७ गावे, १५ वाड्यांसाठी ७५ विहिरी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. त्यासाठी ४० लाख ५२ हजार रुपये, बुडक्या घेणे या योजनेत एका ठिकाणी काम केले जाणार आहे. त्यासाठी दोन लाख पाच हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. असा एकूण २७ कोटी ३५ लाख ९५ हजार खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा व पहा -  Video and Photos : ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव


गतवर्षी होती भीषण टंचाई
२०१८ मध्ये पाऊस पडला नसल्याने २०१९ च्या उन्हाळ्यात ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे जून २०१९ अखेर ३८२ गावांत ४७५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. तसेच ७४ गावे व २२ वाड्यांत ९९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पाणीपातळी वाढली आहे. यंदा मात्र, सुरवातीच्या तीन महिन्यांत कमी पाऊस झाल्याने २०२० मधील उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती होती. परंतु, सलग २२ दिवस झालेल्या पावसामुळे टंचाईची भीती कमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT