hingoli zp 
मराठवाडा

७७ कर्मचारी सापडले जाळ्यात

राजेश दारव्हेकर

हिंगोली: येथील जिल्‍हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी नुकताच पदभार स्‍वीकारला आहे. मंगळवारी (ता. तीन) सकाळी कार्यालयात उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाचा दणका दिला. श्री. माळी हे स्‍वतः वेळे अगोदरच जिल्हा परिषदेत पोचले. या वेळी उशिराने येणाऱ्या ७७ कर्मचाऱ्यांच्या लेट मस्‍टरवर स्‍वाक्षऱ्या घेतल्या आहेत.

राज्य सरकारने सरकारी कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. हा निर्णय लागू करताना कार्यालयांच्या कामकाजाची वेळ वाढविण्यात आली आहे. नव्या बदलानुसार कामकाजाची वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा अशी करण्यात आली आहे. शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा अशी असणार आहे.

हेही वाचा - ​हिंगोलीच्या रुखवताला वाढतेय मागणी ​

उशिराने येण्याच्या तक्रारी वाढल्या

त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, नेहमीच सोयीनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे या निर्णयाने चांगलेच फावले आहे. मात्र, हिंगोली जिल्हा परिषदेत बहुतांश अधिकारी, कर्मचारी उशिराने येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या लाभार्थींंना ताटकळत थांबावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात होता.

गेटला लावले कुलूप

त्यामुळे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी याकडे लक्ष देण्यास सुरवात केली. मंगळवारी उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला. श्री. माळी बुधवारी सकाळी लवकरच कार्यालयात हजर झाले. ते स्‍वतः कार्यालयात वेळेच्या आत पोचले. त्‍यानंतर त्यांनी ९.५० वाजेपर्यंत आलेल्या कर्मचाऱ्यांना आत घेतले. त्‍यांनतर मुख्य प्रवेशद्वार बंद केले. उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेटला कुलूप दिसताच आश्चर्यचकीत झाले. दहा वाजल्यांनतर ७७ कर्मचारी उशिराने आले. या सर्व कर्मचाऱ्यांच्या लेट मस्‍टरवर स्‍वाक्षऱ्या घेऊन त्‍यांना आत प्रवेश दिला.

येथे क्लिक करातूर विकण्यासाठी ‘जात’ सांगण्याची गरज काय ? ​

मध्यांतराच्या नावाखाली गायब

या प्रकाराने उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करूनही अनेक कर्मचारी वेळेवर पोचत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. यामध्येही बहुतांश कर्मचारी मध्यांतराच्या नावाने दोन-दोन तास गायब होतात. सायंकाळी लवकर निघणारे कर्मचारीही आहेत. त्यामुळे कार्यालयात पूर्णवेळ कर्मचारी थांबावेत, यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.


वेळेचे बंधन पाळणे गरजेचे

पाच दिवसांचा आठवडा झाल्याने सर्वांची कामे वेळेत व्हावीत, यापुढे सर्वांनी वेळेवर यावे, अशा सूचना दिल्या आहेत. यापुढे उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांची अर्ध्या दिवसाची रजा धरली जाणार आहे. यामुळे सर्वांनी वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे. मंगळवारी ७७ कर्मचारी उशिराने आले आहेत.

-धनवंतकुमार माळी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT