Aurangabad- solapur national highway Aurangabad- solapur national highway
मराठवाडा

औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय मार्गावरील अपघात चिंताजनक

स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडण्याचे साधन नाही. शिवाय सर्व्हिस रोडही नसल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महामार्गालगतच्या नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे

सकाळ वृत्तसेवा

स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडण्याचे साधन नाही. शिवाय सर्व्हिस रोडही नसल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महामार्गालगतच्या नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे

उस्मानाबाद: औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील काही ठिकाणे अपघाताचे हब होत आहे. स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडण्याचे साधन नाही. शिवाय सर्व्हिस रोडही नसल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महामार्गालगतच्या नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर या मार्गावर वाहतूक सुसाट झाली आहे. शिवाय महामार्ग गुळगुळीत झाल्याने येथील वाहतूकही वाढली आहे. ही बाब जरी कौतुकास्पद असली तरी याचे काही दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. अपघाताची संख्या कमी झाली असली तरी त्या अपघाताची तीव्रता वाढली आहे. अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढणे चिंताजनक आहे.

का घडतात अपघात?

उस्मानाबाद शहरातून लातूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. यातच या मार्गावरील आळणी फाटा येथे अंडरपासची सुविधा नाही. विशेष म्हणजे हा जिल्हा मार्ग असतानाही येथे अंडरपास नसल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी अंडरपास अत्यावश्यक आहेत, अशा अनेक ठिकाणी अंडरपास काढण्यात महामार्ग प्राधिकरणाला अपयश आल्याचे दिसून येत आहे. याशिवाय उस्मानाबाद शहराच्या लगतही काही ठिकाणी अशीच स्थिती आहे. लोहाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. नको त्या ठिकाणी ठिकाणी अंडरपास केल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बावीपाटी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याकडे जाण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी ऊस वाहतुकीच्या ट्रक, ट्रॅक्टर जातात. अशा ठिकाणी अंडरपास असणे अपेक्षित आहे. मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे.

सर्व्हिस रोडचा अभाव

राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहने वेगाने जाणे साहजिकच असते. मात्र त्यासाठी स्थानिक शेतकरी, नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. केवळ राष्ट्रीय महामार्ग आहे, म्हणजे स्थानिक नागरिकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये, अशी प्राधिकरणाची भूमिका योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावरही अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT