Viral Letter esakal
मराठवाडा

Viral Letter: मम्मी-पप्पाला अटक करा अन्...; तिसरीतील साईरामचे पोलिस काकांना पत्र

Viral Letter: लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासन जागृती करीत आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पालकांनी मताचा हक्क बजावावा, यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना गळ घातली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: ‘पोलिस काका, माझे मम्मी-पप्पा मतदानाच्या दिवशी बाहेर गावी जाणार आहेत. त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करून मतदानाला न्या. पण, पुन्हा सोडून द्या’, अशी विनंती करणारे पत्र ताकतोडा (ता. सेनगाव) येथील चिमुकला साईराम कैलास सावके याने गोरेगाव पोलिसांना शनिवारी (ता. ३०) दिले.

लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासन जागृती करीत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगितले जात आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पालकांनी मताचा हक्क बजावावा, यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना गळ घातली जात आहे.

त्यातूनच जिल्हा परिषद शाळा ताकतोडा येथील इयत्ता तिसरीतील साईराम याने घरी आई, वडिलांमध्ये होणारा संवाद पोलिसांना लिहिलेल्या पत्राद्वारे मांडला. मतदानाच्या दिवशी आई-वडिलांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले. त्यांना अटक करून त्यांच्याकडून सक्तीने मतदान करून घेण्याची विनंती साईरामने पत्रातून केली आहे. शिवाय त्यांनी मत दिल्यानंतर त्यांना सोडून द्यावे, असेही त्याने पत्रात नमूद केले आहे.

काय आहे पत्रात?

‘चांगल्या माणसांना मतदान केले तर चांगली माणसं सरकारमध्ये जातील व चांगली कामे करतील. आमचे शिक्षक म्हणतात, आपल्याकडे १०० टक्के मतदान झाले पाहिजे. मात्र, माझे मम्मी-पप्पा बाहेरगावी जाणार असल्याने त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करावी. मतदानानंतर त्यांना सोडून द्यावे’, असा मायना असलेले पत्र साईरामने पोलिसांनी दिले. गोरेगाव पोलिसांनी त्याचे कौतुक करून या पत्राची पोलिस दप्तरी नोंद करून घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT