nanded photo 
मराठवाडा

अशोक चव्हाण कोणाला म्हणाले... मेरे सपनो की रानी कब आयेगी तू.....

शिवचरण वावळे


नांदेड :  वडील मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेले त्याचबरोबर स्वतः युवक काँग्रेसपासून सुरुवात करुन नंतर आमदार, खासदार तसेच विविध खात्यांचे मंत्री ते राज्याचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी जीवनातील अनेक रहस्य उलगडले. सामाजिक, राजकीय जीवनातील अनेक सुख - दुखाःचे क्षण श्री. चव्हाण आणि अमिता चव्हाण यांनी उपस्थित नांदेडकरांनी सांगितले. सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी त्यांची मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले.
डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्याचबरोबर ‘व्हॅलेनटाईन डे’ निमित्त शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी यशवंत महाविद्यालयाच्या प्रागंणात हा योग जुळून आला. ‘आनंदाचे डोही’ या मुलाखतीतून त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू, पट उघडले गेले. यावेळी रितेश देशमुख यांनी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांना अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

वडील नाना म्हणजेच शंकरराव चव्हाण यांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले परंतु स्वतःसाठी मुंबईत घर घ्यावे, असे त्यांनी कधीच वाटले नव्हते. अचानक इंदिरा गांधीचे सरकार कोसळले आणि देशात आणीबाणी लागली. नानांनी राजीनामा दिला होता. तेव्हा मुंबईत रहायचे कुठे? हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी आमदार निवासात दोन खोल्यात सर्व कुटुंब राहिले. त्यातून खूप काही शिकता आले. तो माझ्या जीवनाला कलाटणी देणारा काळ ठरला असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

नाना नेहमी राजकारणात अग्रस्थानी होते. म्हणून माझ्याकडे देखील त्यांचे काही गुण होते. मी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडणुक लढलो. त्यात अभाविपच्या उमेदवाराला हरवून मी विजय झालो. सर्वात जास्त मुलींनी मला मते दिली होती. त्यानंतर महाविद्यालयात महिला प्रतिनिधी म्हणून अमिताला उभे केले निवडून आणले. ती आजही राजकारणात कायम आहे. वडिलांचा स्वभाव शिस्तीचा होता. घड्याळाच्या वेळेवर ते चालत होते. त्यांच्या निवडणुकीची मी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामे पाहिली. त्यामुळे वडिलांनी उभे केलेले सामान्य ते असामान्य जनतेचे नेटवर्क चाळीस वर्षानंतर देखील आजही माझ्या पाठीशी उभे आहे. वडिलांनी उभ्या आयुष्यात सामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले. तेच माझे राजकारणातील आयडॉल आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला घडविण्यात अनेक दिग्गज नेते आहेत. शंकरराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यात व्यक्तीगत वाद कधीच नव्हते. मराठवाड्याचा विकास आणि निधीवरुन वाद होते. शरद पवार राजकारणातले हिरो आहेत. त्यांच्याकडे बघून आजही तरुणाईला प्रेरणा मिळते. अजित पवार आणि माझे चांगले जमते. विकासाच्या प्रश्नावर वाद होतो. त्याला वाद म्हणत नाहीत. विलासराव देशमुख यांना मी मोठा भाऊ मानतो. कुटुंबाप्रमाणे आमचे संबंध आहेत. हे कुटुंब आजही कायम आहे. शेवटी स्वतःला स्वतःच सिद्ध करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वक्तशीर, प्रामाणिक आणि निर्भिडपणा हा नानांचा स्वाभाव होता. त्यांची हीच भूमिका घेऊन मी पुढे जात आहे. राज्याचा सावर्जनिक बांधकाम मंत्री म्हणून मला सुद्धा तेलंगणा आणि आंध्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातील रस्ते गुळगुळीत व्हावेत, असे प्रामाणिक पणे वाटते. पुढील पाच वर्षात महाराष्ट्रातील रस्ते चांगले करण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक; डिजिटल हल्ल्याने खळबळ, समर्थक आक्रमक!

Green Card Rules Changes : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतीयांना मोठा धक्का; ग्रीन कार्डसाठीचे नियम बदलले, आता मायदेशी परतावं लागणार...

Marathi Live News update: अकरावी प्रवेश प्रक्रियेचा फज्जा, दुसऱ्या दिवशीही गोंधळ

Konkan Heritage: कोदवली येथे तीन मराठाकालीन शिलालेख; फेब्रुवारी १८४५ मध्ये झाला श्री शंकरेश्वराचा जीर्णोद्धार, बंदर प्रशासनाचा इतिहास

Beed Encroachment: कचऱ्यात फेकली आजीची भाजी; अतिक्रमणविरोधी कारवाई, बीडमध्ये भाजीविक्रेत्या वृद्धेला अश्रू अनावर..

SCROLL FOR NEXT