aurangabad police seized one crore 
मराठवाडा

अबब..चलनातून बाद एक कोटींच्या नोटा आल्या कुठुन?

मनोज साखरे

औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीनंतर चलनातून शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल एक कोटींच्या बाद झालेल्या नोटा औरंगाबादेत सापडल्या. या नोटा पोलिसांनी जप्त केल्या असुन ही कारवाई गोपाल टी हाऊस येथे गुरुवारी (ता. 26) सायंकाळी करण्यात आली. 

नोटबंदीनंतर देशभरात जुन्या नोटा बॅंकामार्फत गोळा करण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतरही चलनातून बाद झालेल्या औरंगाबादेत नोटा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गोपाल टी हॉटेल, उस्मानपुरा परिसरात पोलिसांनी शब्बीर शहा (वय 40, रा. भानसहीवरा, ता. नेवासा. जि. अहमदनगर) याला संशावरुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे 99 लाख 65 हजारांच्या नोटा सापडल्या. या नोटा पाहुन पोलिसही आश्‍चर्यचकीत झाले. शब्बीर शहाची चौकशी केली.

त्यावेळी या नोटा औरंगाबादेतील मोहम्मद नईम मोहम्मद इब्राहीम (वय 45, रा. कटकटगेट) व मोहम्मद इलीयास मोहम्मद युनुस (वय 38, रा. सब्जीमंडी) यांना देण्यासाठी आणल्या गेल्या. चलनातून बाद झालेल्या एक कोटींच्या बदल्यात चलनातील वीस लाख रुपये मिळणार होते. असे त्याने चौकशीत सांगितल्याचे पोलिस म्हणाले. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT