प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र. 
छत्रपती संभाजीनगर

वाळूजमध्ये नगर-औरंगाबाद महामार्गावर वाहनाच्या धडकेत एक ठार

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : महामार्ग ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावर (Nagar-Aurangabad Highway) वाळूज (Waluj) जवळील टोलनाक्या लगत सोमवारी (ता.दोन) रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली. सचिन ज्ञानेश्वर गारकर (वय ३८, रा. तुर्काबाद खराडी ता. गंगापूर) असे मृताचे नाव आहे. तुर्काबाद खराडी येथील सचिन गारकर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन मोठी वाहने आहेत. घटनेच्या वेळी ते त्यांच्या दुचाकीवरून नगर-औरंगाबाद महामार्गाने वाळूजकडून (Accident In Aurangabad) तुर्काबाद खराडीकडे जात होते. टोलनाका ओलांडून ते निसर्ग ढाब्यासमोर आले, तेव्हा त्यांनी त्यांची दुचाकी महामार्गालगत उभी करून ते महामार्ग ओलांडून निसर्ग ढाब्याकडे निघाले.

एक मार्ग ओलांडून विरुद्ध बाजूच्या मार्गावर आले. तेव्हा भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते पक्क्या मार्गावर आदळल्याने तत्काळ बेशुद्ध झाले. धडक देणारे वाहन भरधाव निघून गेले. अपघाताची माहिती मिळताच सचिन यांचा भाऊ नितीन गारकर व त्यांचा मित्र सिराज पठाण यांनी जखमी सचिन यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान,या प्रकरणी वाळूज पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT