Aurangabad News
Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

अष्टावधानी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मधुकर कांबळे

व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टावधानी आणि सामाजिक ऋणांची जाण असणारे होते. आज प्रत्येक विषयात वेगवेगळे तज्ञ आहेत, मात्र कायदा, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, शेती, सिंचन, पाणी, महिलाविषयक, कामगार, शेतकरी, शेतमजूर आदी क्षेत्रात त्यांचा केवळ हातखंडाच नव्हे, तर त्या क्षेत्रात नवीन आणि सुधारीत संकल्पना मांडल्या. नुसत्या मांडल्या नाहीत तर त्यांचा राष्ट्रउभारणीत उपयोग केला म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे.

बाबासाहेबांचे कायद्याचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले होते. संविधानात कायदा तयार करताना तो समाजाच्या सर्व घटकांशी संबंधित असला पाहिजे याची पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. २ वर्ष ११ महिने १७ दिवस संविधान तयार होण्यास काळ लागला. संविधान तयार करण्याचा भार एकटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होता.त्यांचे कार्य नि:संदेह प्रशंसनीय आहे. सर्वसामान्य व्यक्ती केंद्रीभूत मानून कायद्याची चौकट उभारली. कायद्याच्या व्यवस्थेत सर्वसामान्य माणसाच्या हक्क व अधिकाराचे रक्षण केले. कायद्यापुढे सर्व समान आहेत. संविधान तयार करताना समानता हे अतिशय महत्त्वाचे तत्व पाळले गेले. 

अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा दलितेतर यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर नैतिकता आणि चारित्र्य सांभाळत ज्ञानसाधना केली. या ज्ञानाचा, विचारांचा उपयोग जनतेसाठी केला पाहिजे हे ठरवून त्यांनी निष्ठापूर्वक कार्य केले. शेतकरी , शेतमजूर, कामगार, गावकामगार, ब्राह्मणेतर आणि दलित, बारा बलुतेदार, भटके आणि भटके विमुक्त, महिला, आदिवासी यांच्यासह सर्वच वंचितांच्या शोषितांच्या चळवळी उभ्या केल्या आणि त्या चालवल्या. 

परकीय सत्तेच्या विरुद्ध आणि अंतर्गत शोषकत्तेच्या विरुद्ध त्यांनी लढा पुकारला. देशाशी अविचल निष्ठा आणि सामान्य जनतेसाठी या निष्ठेतून अविस्मरणीय कार्य हे या लढ्याचे सूत्र होते. माणूस म्हणून जगण्याचे हक्क जाती धर्माच्या नावाने संपुष्टात आणणे हे एक भ्रष्टवर्तनच आहे असे त्यांचे मत होते.

निकोप समतेवर आधारलेल्या शोषणविरहित निर्भय समाजाचे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या परिवर्तनाच्या सर्व चळवळींचे हेच उद्दिष्ट होते. डॉ. आंबेडकर या देशाचे, या देशातील सर्व जनतेचे राष्ट्रावर निष्ठा असलेले नेते आहेत. नवविचाराने नव समाज निर्माण करणारे नेते आहेत. विविध विषयातील त्यांचे चिंतन आणि लेखन, विविध क्षेत्रातील त्यांचे व्यापक विशाल कर्तृत्व आणि नेतृत्व हिमालया पेक्षा अधिक उंचीचे असल्याचे इतिहास सिद्ध झाल्याचे डॉ. लुलेकर म्हणतात. 

देशाचे नेतृत्व करणारे डॉ. आंबेडकर 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे नेतृत्व करून त्यांनी इतिहास बदलण्याची ऐतिहासिक जबाबदारी पूर्ण केली. मात्र ते यामुळे केवळ दलितांचेच कैवारी म्हणता येणार नाही तर त्यांनी या देशातील सर्वच समाज घटकांची स्थिती विचारात घेऊन त्यांनी आपल्या विचारातून कार्यातून त्यांचेही नेतृत्व केले. तसेच देशातील सिंचन, ऊर्जा, कुटुंबनियोजनाच्या समस्यांवरील उपायांचे, दिशा देण्याचे नेतृत्वही त्यांनीच केले. 

अभ्यासातून विविध संख्येने अल्प असलेल्या जाती-जमातींच्या भविष्या विषयी चिंतन करून त्यांच्या प्रश्‍नांना जाहीरपणे मांडण्याचे नेतृत्व डॉ. आंबेडकर यांनीच केले. देशाचे उज्ज्वल भविष्य ठरवण्यासाठी लागणाऱ्या लोकशाही मूल्यांचा अधिष्ठान असणारी घटना देशाला देण्याचे नेतृत्व त्यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तरकाळातील समस्यांवर भाष्य करून मार्ग दाखवण्याचे नेतृत्व डॉ. आंबेडकर यांनी केल्याचे मत डॉ. लुलेकर नोंदवतात. 

शेतीसाठी लढा दिला 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतीविषयक विचारांविषयी कृषिअभ्यासक व गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे सांगतात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी वैधानिक ठिकाणी बोलणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मोर्चे काढण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांनी शेतकरी संघ चालवला. त्यांना आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी भूमिका घेतली, चळवळी चालवल्या. शेतसारा, शेतीधारण क्षेत्र, लोकसंख्यावाढीमुळे शेतीवर पडणारा बोजा, शेती व्यवसायातील भांडवलाचे नियोजन,शेतीसाठी पाटबंधाऱ्याची गरज, शेतीतील भांडवली गुंतवणुक यासाठी अनेक चळवळी उभारल्या. 

देशातली शेती आणि शेतकरी या विषयाकडे त्यांनी या चळवळींच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधले. सिंचनाच्या क्षेत्रातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान आहे. पाण्याचे संवर्धन करून त्याचा योग्य वापर केला तर विकास शक्य होइल असा विचार करायला लावणारा नवा दृष्टिकोन त्यांनी दिला. नद्या जोडण्याचाही विचार त्यांनी त्यावेळी मांडला होता. 

स्त्रियांचे उद्धारकर्ते 

स्त्रियांचे सामाजिक स्थान उंचावण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिज्ञाच घेतली होते. कुणाही नागरिकाबाबत भेदभाव करता येणार नाही.सर्व समान आहेत अशी कायद्याद्वारे तरतूद करून स्त्रियांना समानता बहाल केली. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंगल खिवंसरा म्हणतात डॉ. आंबेडकर हे स्त्रियांचे उद्धारकर्ते आहेत हिंदू कोड बिल हे त्याचे प्रमाण आहे.

देशाच्या समतोल विकासाचे मापदंड त्या देशातील स्त्रियांच्या विकासावर अवलंबून असते यासाठी विवाहिता, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत स्त्रियांच्या संरक्षणाचा हक्क व विकासाचे उद्दिष्ट ठेऊन त्यांनी हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला होता. बाबासाहेबांनी सातत्याने स्त्रियांच्या प्रश्‍नांचा विचार केला यासाठी समस्त स्त्रीवर्गाने डॉ. बाबासाहेबांचे स्त्रीविषयक विचार समजून घेण्याची गरज आहे.

अर्थतज्ञ बाबासाहेब

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक पैलू आहेत. मात्र अर्थतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा पैलू दुर्लक्षिला गेला आहे. मिलिंद कला महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. इंद्रजीत आल्टे म्हणाले, औद्योगिक विकासासाठी डॉ. आंबेडकर यांनी महत्त्वाच्या उद्योगाचे राष्ट्रीयकरण करण्यावर भर दिला. तसेच खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेण्याचे धोरण आखले. हे सार्वजनिक क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी रोल मॉडेल ठरावे ही त्यांची अपेक्षा होती. शेती आणि शेतीच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी त्यांनी शेतीच्या क्षेत्रात राज्य समाजवाद व सामुदायिक शेतीच्या संकल्पनेचा पुरस्कार केला. 

यात सर्व संसाधन व सामग्री पुरवण्याची जबाबदारी राज्यावर टाकण्यात आली होती. तसेच राजकीय हस्तक्षेपविरहित स्वतंत्रपणे वित्तीय नियंत्रण ठेवणारी मध्यवर्ती संस्था स्थापन करावी असे सुचवले होते, त्यावरच पुढे रिझर्व बॅंकेची स्थापना झाली व सर्व चलनविषयक व्यवस्थापनाची जबाबदारी ही संस्था पाहत आहे. सर्वसामान्य माणुस हा आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असावा असे त्यांचे मत होते. त्यामुळे सामान्य माणसाच्या आर्थिक स्वातंत्र्याला महत्व दिले. राजकीय स्वातंत्र्याबरोबर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुरस्कार केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT