sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद: कोविडच्या रुग्णांसाठी आता एक हजार खाटा

घाटीत सुविधांत वाढ :बालकांसाठी ६० खाटा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: घाटीत कोविडच्या सुरुवातीला २०८ खाटा होत्या. त्यात वाढ करुन आता क्षमता एक हजारपर्यंत वाढविण्यात आली. यात बालकांसाठी ६० खाटा असन व्हेंटीलेटर्सची संख्या ७८ वरुन ३०८ वर पोचली आहे. ऑक्सिजनची क्षमता ५३ किलोलिटरपर्यंत झाली असून अजूनही ऑक्सिजन प्रकल्पासाठी घाटी प्रयत्नशिल आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे रुग्णसेवेसाठी आवश्यक ऑक्सिजन व ‘एमजीपीएस’ सिस्टीम बाबत आढावा अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला. कोविडसाठी पूर्वी उपलब्ध सोयीसुविधा व सद्यस्थितीपर्यत उभारण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत आढावा घेण्यात आला.

ऑक्सीजन पुरवठाधारक सागर गॅसेस यांनी कोविड काळात मोठा संसर्ग फैलावला असताना ऑक्सीजनचा पुरवठा अविरत ठेवल्याबाबत तसेच श्री. जहागिरदार यांनी कोविडमध्ये ऑक्सीजन पाईपलाईन वेळेवर केल्याने कोविड रुग्णांना रुग्णसेवा देण्यात मदत मिळाली. यामुळे अधिष्ठातांनी आभार मानले.

"महामारीच्या सुरुवातीला कोविड चाचणीसाठीचे नमुने तपासणी पुणे येथे केली जात होती. परंतु घाटीत ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळा सुरु करण्यात आली. प्रयोगशाळेची आताची क्षमता दोन हजार नमुने प्रती दिवस आहे. घाटीत एकूण १५ हजारांपेक्षा जास्त कोविड आजाराने अतिगंभीर स्वरुपातील रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.’’-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT