Aurangabad Accident News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची दुभाजक ओलांडून ट्रकला धडक; एक ठार, तर एक गंभीर जखमी

शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : बीडकडुन येणाऱ्या कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून औरंगाबादकडुन पाचोडकडे जाणाऱ्या ट्रकला समोरुन धडकली. यात कारमधील एक जण जागीच ठार , तर तिन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.२०)  रोजी रात्री पाऊणे बाराच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापुर (ता.पैठण) शिवारात घडली आहे.


औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने बीडकडून औरंगाबादकडे जाणारी कार  (एमएच २० ईवाय ६९५३) रजापुर शिवारात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून औरंगाबादकडून पाचोडकडे जाणाऱ्या ट्रकला (एमएच ०४ जेके ४५६५) धडकल्याने कार व ट्रकचा भीषण अपघात झाला.

यात कारचा चुराडा होऊन कारमधील मोरेश्वर वैद्य हे जागीच ठार झाले, तर संजय मांडे हे गंभीर झाले. हे दोघेही औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. मागे बसलेली एक महिला व एक छोटी मुलगी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांची नावे वृत्त लिहेपर्यंत माहित झाली नव्हती. जखमींना आयआरबीच्या 1033 रुग्णवाहिकेचे डॉक्टर डॉ. विजय धारकर, चालक आत्मराम गाढेकर, रवी गाढे यांनी पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. थापटी तांडा येथील विनोद राठोड व ग्रामस्थांनी मदत कार्य केले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senior Citizens Property Rights : सून सासू-सासऱ्यांच्या घरात राहू शकते, पण मालकी हक्क मिळणार नाही; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Shilpa Shinde : 'हाय दैय्या!' शिल्पा शिंदे परतणार? 'अंगुरी भाभी' म्हणून 8 वर्षांनंतर पुनरागमन

Nanded News: खूनप्रकरणी बाप-लेक अटकेत; तरुणाचा खून करून विहिरीत फेकले

Mahabaleshwar News: लोकसहभागातून सुटेल मानव- वन्यजीव संघर्ष; महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांची बैठ, वन विभागासोबत चर्चा

'मी कधीही पुरस्कार विकत घेतले नाही' ट्रोलर्संना अभिषेकचं उत्तर, म्हणाला...'मी मेहनतीनं सन्मान मिळवलाय '

SCROLL FOR NEXT