charging car 
छत्रपती संभाजीनगर

"दिल्ली, नोएडा पाठोपाठ आता औरंगाबाद शहरात चार्जिंग सेंटर' 

माधव इतबारे

औरंगाबाद : प्रदूषण कमी करण्यासाठी शासनस्तरावरून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीला शहरात १० ठिकाणी असे स्टेशन उभारले जाणार असून आहेत.

त्यासाठी टाटा मोटर्स व टाटा पॉवर कंपनीसोबत चर्चा झाल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. दिल्ली, नोएडा पाठोपाठ ठाणे शहरात अशा प्रकारचे चार्जिंग स्टेशन उभारले जात असून, त्यात आता औरंगाबाद शहराचा समावेश होणार असल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात दहा ठिकणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासंदर्भात टाटा मोटर्स व टाटा पॉवर्स कंपनीसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी सहमतीही दर्शवली आहे.लवकरच याबद्दल सामंजस्य करार होईल- आस्तिकुमार पांडेय (प्रशासक, महापालिका)

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या वाहनांमुळे प्रदुषण झपाट्याने वाढत आहे. ते कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे गरजेचे असल्याने केंद्र शासनाने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

(edited by- pramod sarawale) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : माझ्या मुलीसारखी, पण चुकी झाली! एकटीला पाहून भररस्त्यात छेड काढली, तरुणीनं धडा शिकवताच धरले पाय

Pune Metro : 'कारशेड'साठी जागाच नाही! पुणे मेट्रोच्या चौथ्या टप्प्यात मोठा अडथळा; CWPRS ने प्रस्ताव फेटाळला

Jayant Patil vs Gopichand Padalkar : ‘...राव तेवढा ढापलेला कारखाना परत द्या’ भर चौकात लावला पोस्टर, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद टोकाला

काठीला कापड गुंडाळल्यासारखी दिसते... बारीक असल्याने 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला हिणवलं; अनुभव सांगत म्हणाली-

Pune Redevelopment : लोकमान्यनगरचा पुनर्विकास राजकीय आणि 'म्हाडा'च्या हस्तक्षेपामुळे थांबला! नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT