छत्रपती संभाजीनगर

मृतांची परवड अन् नातेवाइकांचेही हाल, मृतदेह सोडून परवानगीसाठी माराव्या लागताहेत खेट्या

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मृतदेह रुग्णालयातच सोडून अंत्यविधीसाठी आवश्‍यक परवानग्या जमा करताना या कार्यालयातून त्या कार्यालयात खेट्या माराव्या लागत आहेत. महापालिकेच्या जन्म-मृत्‍यू नोंदणी कार्यालयात गेल्यानंतर आधी पोलिस स्टेशनला जा, त्यानंतर आमच्याकडे या, असा सल्ला दिला जात आहे. रुग्णालयातून महापालिका, महापालिकेतून पोलिस स्टेशन व पुन्हा महापालिका कार्यालय अशा हेलपाट्यांमुळे अंत्यविधीला चार ते पाच तास विलंब होत आहे. त्यात स्मशानभूमीतील वेटिंग वेगळीच. इतर जिल्ह्यांतून आलेल्या नातेवाइकांची तर शासकीय कार्यालये शोधताना दमछाक होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्मशानभूमीत एकाचवेळी अनेकांचे अंत्यसंस्कार होत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर नातेवाईक सात-आठ दिवस रुग्णालयाबाहेरच ताटकळत असतात. त्यात परजिल्ह्यातून औरंगाबादेत येणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे. यातील अनेक जण बरे होऊन घरी जात असले तरी काही जणांवर मृत्यू ओढवत आहे. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्का अनेकांना सहन होत नाही; पण हे दुःख विसरून अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडावेच लागतात. त्यासाठी मोठा मनस्ताप नातेवाइकांना सहन करावा लागत आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्याचे अनेकवेळा हॉस्पिटलमार्फत सायंकाळी सांगितले जाते.

तुम्हांला मृतदेह मिळणार नाही, महापालिकेने नियुक्त केलेली एजन्सी मृतदेहावर अंत्यसंस्कार करेल; पण अंत्यविधीसाठी आवश्‍यक परवानग्या घेऊन या, असा सल्ला रुग्णालयातील कर्मचारी देतात. त्यामुळे साहजिकच नातेवाईक स्मशान परवाना घेण्यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात जातात. त्याठिकाणी आधी संबंधित पोलिस ठाण्याची परवानगी घेऊन या, अशा सूचना केल्या जातात. पण अनेकांना घरच्या पत्त्यानुसार पोलिस स्टेशनमध्ये जायचे की स्मशानभूमी असलेल्या भागातील पोलिस स्टेशनमध्ये जायचे हेच समजत नाही. पोलिस स्टेशनमधून परवानगी घेऊन पुन्हा महापालिकेत जावे लागते. त्यानंतर स्मशान परवान्यातील एक पावती संबंधित स्मशानजोग्याला देण्यासाठी जावे लागते.

कागदपत्रे जमविताना कधी कधी होते रात्र

कोरोनाबाधिताचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बाहेरगावच्या नागरिकांना दिव्य पार पाडावे लागते. या हेलपाट्यामध्ये अनेकांना रात्रीचा एक वाजत आहे. बाहेरगावाहून उपचारासाठी शहरात आलेल्या नातेवाइकांची हे सर्व सोपस्कर पार पाडताना दमछाक होत आहे.

कोविडमुळे घरातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना हेलपाटे मारावे लागत आहेत; पण याबाबत प्रशासन गंभीर नाही. एक खिडकी योजना सुरू करून नातेवाइकांना आवश्‍यक परवानग्या एकाच ठिकाणी द्याव्यात.

- भाऊसाहेब जगताप, कॉंग्रेसचे माजी गटनेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT