Crisis of water  Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत पाणीप्रश्न गंभीर; आठवड्यातून फक्त 45 मिनिटं पाणीपुरवठा

काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून शहरातील पाण्याच्या टाक्या कोरड्या असल्याचं चित्र पाहायला मिळतंय

दत्ता लवांडे

औरंगाबाद : आज औरंगाबादेत भाजपाने जल आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे. औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न बिकट असून आठवड्यातून एक दिवस फक्त ४५ मिनिटांसाठी पाणी येते. त्यामुळे मोठ्या पाणीटंचाईचा सामना सध्या औरंगाबादकरांना करावा लागत आहे. त्याचबरोबर भाजपा यासाठी मोर्चा काढणार असून शिवसेना भाजपाला विरोध करताना दिसत आहे.

(Aurangabad City Water Crisis)

औरंगाबाद शहराची लोकसंख्या सध्या १६ ते १८ लाखांच्या घरात आहे. शहरासाठी दररोज साधारण २०० ते २२० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. पण सध्या शहरासाठी फक्त १२५ ते १४० दशलक्ष पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागताना दिसत आहे. दरम्यान शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन जुन्या झाल्याने मर्यादित क्षमतेत पाणीपुवठा केला जात असल्याचं सांगितलं जातंय. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

भर उन्हाळ्यात पाणी टंचाई असल्याने पाणीबाणीची परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दर पाच तर काही ठिकाणी दर आठ दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील सिडको, हडको या भागात पाण्याची टंचाई अधिक तीव्र असल्याचं पाहायला मिळतंय. सध्याची ओरड लक्षात घेता ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा वाढवण्यात आला असून शहरातील समांतर पाणीपुरवठा योजना रद्द झाल्याने शहर १० वर्षे मागे गेल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून दिवसभरात टँकरच्या ४०० फेऱ्या कराव्या लागत आहेत. दरम्यान पाण्याच्या टाक्यामध्येच पाणी नसल्याची परिस्थिती औरंगाबाद शहरात पाहायला मिळत आहे.

शहरातील या पाणीटंचाईमुळे भाजपाच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. त्याअगोदर भाजपा शिवसेनेमध्ये बॅनर वॉर पाहायला मिळालं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून त्यादृष्टीने या आंदोलनात भाजप कोणत्या मुद्द्यांना हात घालणार आहे ते पहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT